28.7 C
Mumbai
Monday, April 28, 2025
घरविशेषदहावी, बारावी बोर्डाची वेबसाईट सायबर सुरक्षित करा !

दहावी, बारावी बोर्डाची वेबसाईट सायबर सुरक्षित करा !

माहिती तंत्रज्ञान मंत्री अँड आशिष शेलार यांच्या सूचना

Google News Follow

Related

दहावी, बारावी बोर्डाच्या वेबसाईटची क्षमता वाढवणे व सायबर सुरक्षित करण्याबाबत येत्या सात दिवसात अहवाल सादर करा, असे निर्देश माहिती तंत्रज्ञान मंत्री अँड आशिष शेलार यांनी आज दिले.

दहावी, बारावी निकालाची तारीखेला विद्यार्थ्यांची गैरसोय होऊ नये म्हणून वेबसाईट बाबत आढावा घेण्यासाठी आज बोर्डाचे अधिकारी आणि माहिती तंत्रज्ञान विभागाच्या अधिकाऱ्यांची संयुक्त बैठक मंत्री ऍ़ड. आशिष शेलार यांनी घेतली. महाराष्ट्र माध्यमिक व उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परिक्षा बोर्डाचे अध्यक्ष शरद गोसावी, शालेय शिक्षण विभागाचे उपसचिव तुषार महाजन आणि माहिती तंत्रज्ञान विभागाचे संचालक अनिल भंडारी आणि सचिव सदाम आंधळे या बैठकीला उपस्थित होते. यावेळी बोर्डाच्या वेबसाईटची क्षमता व त्यामध्ये येणाऱ्या तांत्रिक अडचणी याबाबत माहिती मंत्री शेलार यांनी जाणून घेतली.

हे ही वाचा:

एलपीजी सिलेंडर ५० रुपयांनी महागले!

विवान कारुळकरचा ब्रिटनच्या हाऊस ऑफ कॉमन्सचे सन्मानचिन्ह देऊन गौरव

सौदी अरेबियाने भारतासह १४ देशांच्या व्हिसावर घातली बंदी; कारण काय?

लातूरमधील अनेक कुटुंबांचे नशीब बदलले

१० वी व १२ वीचे निकाल जाहीर झाल्यावर महाराष्ट्रातली लाखो मुले एकाच वेळेस रिझल्ट वेबसाईट वर लॉगईन करुन बघतात. अशा वेळेस सदर वेबसाईटवर ताण येउन ती साईट क्रॅश होते व मुलांची गैरसोय होते. सदर वेबसाईट प्रणालीचे सतत लोड टेस्टिंग करुन घेणे आवश्यक आहे व त्यानंतर त्याची क्षमता वाढवण्याची आवश्यक्ता आहे. त्यासाठी सध्याच्या वेबसाईटचा क्षमतेचा अहवाल तयार करा, त्या वेबसाईटची क्षमता वाढवण्यासाठी काय करता येईल याबाबत अहवाल तयार करा. तसेच सायबर सिक्युरिटी हा आता महत्त्वाचा मुद्दा आहे. त्यामुळे यासाठी काय करावे लागेल याचाही अहवाल सात दिवसात द्या असे निर्देश विभागाला देण्यात आले.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

113,000चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
245,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा