32 C
Mumbai
Friday, March 29, 2024
घरराजकारणबंडखोर ३८ आमदारांनी ठाकरे सरकारचा पाठिंबा काढल्याचा याचिकेत दावा

बंडखोर ३८ आमदारांनी ठाकरे सरकारचा पाठिंबा काढल्याचा याचिकेत दावा

Google News Follow

Related

शिवसेना आणि बंडखोर आमदारांचा शिंदे गट यांच्यात कायदेशीर लढाई सुरू झाली आहे. १६ बंडखोर आमदारांना पाठवलेल्या अपात्रतेच्या नोटिसांना आणि गटनेतेपदाच्या नियुक्तीला शिंदे यांनी सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिलं आहे. या याचिकेत शिंदे गटाने ३८ आमदारांनी महाविकास आघाडी सरकारचा पाठिंबा काढल्याचा दावा केला आहे.

याचिकेत म्हटलं आहे की, ३८ आमदारांनी महाविकास आघाडी सरकारचा पाठिंबा काढला आहे. त्यामुळे महाविकास आघाडी सरकार अल्पमतात असल्याचा दावा एकनाथ शिंदे गटाने सर्वोच्च न्यायालयात केला आहे. यासोबतच संजय राऊत यांच्या वक्तव्याच्या व्हिडीओच्या लिंक सोबत देण्यात आल्या आहेत.

हे ही वाचा:

मुडदे येतील… यावरून संजय राऊत लक्ष्य

अयोध्येच्या निर्मली कुंड चौक परिसरात आढळले हातबॉम्ब

“आदित्य ठाकरे राऊतांसारखं बोलायला लागले तर भविष्य वाईट”

“शिवसेना पक्ष प्रमुखांना राऊतांसारखा प्रवक्ता चालतो का?”

शिवसेना विधिमंडळ पक्षाच्या बैठकीला अनुपस्थित राहिल्याबद्दल एकनाथ शिंदे यांच्यासह १६ आमदारांना नोटीस बजावण्यात आली असून, सोमवारी सायंकाळपर्यंत त्याला उत्तर द्यायचं आहे. मात्र, शिंदे गटाच्या वतीने या नोटिसींनाच सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्यात आलं. तसंच नवे गटनेते नियुक्त करण्याच्या निर्णयालाही आव्हान देण्यात आलं आहे. त्यावर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू आहे. काल उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत हे गुवाहाटीमध्ये शिंदे गटात सहभागी झाले. त्यामुळे शिंदे गटातील शिवसेना आमदारांची संख्या ३९ झाली आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
144,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा