महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर होताच राजकीय तापमान वाढू लागले आहे. दरम्यान, शिवसेनेच्या (उबाठा) उपनेत्या आणि राज्यसभा खासदार प्रियांका चतुर्वेदी यांनी एक मोठे वक्तव्य केल्याने राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे. वास्तविक, एका पॉडकास्ट चॅनलला दिलेल्या मुलाखतीत प्रियंका चतुर्वेदी यांना त्यांच्या आवडत्या नेत्याबद्दल विचारण्यात आले होते. त्यांना विचारण्यात आले की, आजचा महान राजकारणी कोण आहे? यावर उत्तर देताना प्रियांका चतुर्वेदींनी घेतलेल्या दिग्गज नेत्याचे नाव ऐकून उद्धव ठाकरेंना मोठा धक्का बसला असेल. यावरून भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी देखील टोला लगावला आहे.
प्रियंका चतुर्वेदी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे कौतुक करत त्यांना ‘महान राजकारणी’ म्हटले आहे. त्या म्हणाल्या, पंतप्रधान मोदी लोकांना विशेषत: तरुण आणि महिलांना जोडण्यात तज्ञ आहेत. पंतप्रधान मोदींनी भारतीय जनता पक्षासाठी मोठ्या जबाबदाऱ्या घेतल्या असल्याचेही त्यांनी मान्य केले.
प्रियांका चतुर्वेदी म्हणाल्या, सलग तिसऱ्यांदा केंद्रात भाजपचे सरकार बनवण्यात पंतप्रधान मोदींनी महत्त्वाची भूमिका बजावली. ते तिसऱ्यांदा पंतप्रधान झाले. पक्षाला बहुमत मिळाले नसले तरी त्यांनी भाजपला सर्वात मोठा पक्ष बनवले. सलग तिसऱ्या लोकसभा निवडणुकीत मतदारांना आपल्या बाजूने आणण्यात ते यशस्वी झाले.
हे ही वाचा :
हमासच्या सिनवारचा नवा व्हीडिओ, बायकोकडे दिसली २७ लाखांची बॅग!
परदेशात उच्च शिक्षणासाठी जाण्याच्या प्रवृत्तीबद्दल उपराष्ट्रपतींकडून चिंता