30 C
Mumbai
Thursday, April 10, 2025
घरविशेषवक्फ सुधार विधेयक मुस्लिमांसाठी हितकारकच !

वक्फ सुधार विधेयक मुस्लिमांसाठी हितकारकच !

Google News Follow

Related

लोकसभा आणि राज्यसभेत वक्फ सुधार विधेयक संमत झाल्यानंतरही यासंदर्भातील वाद-विवाद थांबताना दिसत नाहीत. दरम्यान, भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि माजी मंत्री सैयद शाहनवाज हुसैन यांनी समस्तीपूरमध्ये सांगितले की, लोकसभा आणि राज्यसभेत मांडले गेलेले वक्फ सुधार विधेयक मुस्लिम समाजाच्या हितासाठी आहे. या विधेयकामुळे गरिब मुस्लिमांना लाभ होईल आणि ते नव्याने आपला विकास करू शकतील. पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी सांगितले की, या विधेयकाचे दोन्ही सभागृहांतून संमत झाल्यानंतर त्यांना सोशल मीडियावर सातत्याने धमक्या आणि शिवीगाळ केली जात आहे. मात्र, अशा धमक्यांपासून ते घाबरणार नाहीत, आणि अशा लोकांची ओळख पटवण्याचे काम सुरु आहे.

एका प्रश्नाच्या उत्तरात त्यांनी सांगितले की, या विधेयकामुळे एनडीएच्या मतांमध्ये वाढ होईल. जद(यू)मधून मुस्लिमांनी पक्ष सोडल्यासंबंधी विचारल्यावर त्यांनी स्पष्ट केले की, “कोणताही मोठा चेहरा पक्ष सोडत नाहीये, त्यामुळे काही फरक पडणार नाही. हे विधेयक मुस्लिमांच्या हिताचे आहे. ते पुढे म्हणाले, मुस्लिम बांधवांनी घाबरण्याची गरज नाही. या समितीचे नेतृत्वही मुस्लिमच करणार आहेत. जसे सीएएबाबत लोकांना गोंधळवले गेले, त्याचप्रमाणे या विधेयकावरूनही विरोधकांकडून दिशाभूल केली जात आहे.

हेही वाचा..

मनोज कुमार पंचतत्वात विलीन

कुणाल कामराना तिसरा समन्स

देशाच्या समुद्री इकोसिस्टमच्या बळकटीकारणासाठी देश सज्ज

कोलंबोमध्येही फक्त मोदी मोदी आणि मोदीचं…!

शाहनवाज हुसैन यांनी मुस्लिम समाजाला आवाहन केले की, कोणाच्याही बहकाव्यात येऊ नका, पंतप्रधान नरेंद्र मोदी हे ‘सबका साथ, सबका विकास’ या तत्त्वावर काम करत आहेत. दरम्यान, बिहारचे मंत्री मंगल पांडेय यांनी वक्फ सुधार विधेयकाच्या विरोधावर प्रतिक्रिया देताना सांगितले की, कोहराम तेच लोक माजवत आहेत, ज्यांना जुने रुढीवादी कायदेच चालू ठेवायचे आहेत. काही लोकांचा अधिकार आणि वर्चस्व यामुळे टिकून होता. पण, सामान्य लोक आनंदी आहेत. वक्फ बिल हे एक न्याय्य विधेयक आहे. गरीब पसमांदा मुस्लिम यामुळे अतिशय आनंदी आहेत.

राजदच्या विरोधावर टोला मारताना त्यांनी सांगितले की, तेजस्वी यादव यांनी आधी आपल्या वडिलांचा संसदेतील तो जमिनींवरील कब्जाबाबतचा भाषण ऐकावा, ज्यात पटण्याच्या डाकबंगला चौकाचे उदाहरण दिले गेले होते. ते पुढे म्हणाले, ज्यांना वाटते की आता त्यांचा मालकी हक्क संपणार आहे, त्यांनाच यातून त्रास होतोय आणि तेच लोक विरोध करत आहेत. विरोधकांना प्रत्यक्षात वक्फ बिलाशी काही घेणं-देणं नाही. ते फक्त नरेंद्र मोदींचा विरोध करत आहेत, कारण त्यांना भीती वाटते की यामुळे मोदींची लोकप्रियता वाढेल.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

113,000चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
241,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा