वारकऱ्यांना महायुती सरकारकडून भेट; पंढरपूरला जाणाऱ्या वाहनांना टोलमाफी

एसटी महामंडळाच्या बसेसलाही सवलत

वारकऱ्यांना महायुती सरकारकडून भेट; पंढरपूरला जाणाऱ्या वाहनांना टोलमाफी

राज्याच्या कानाकोपऱ्यातून पंढरीच्या दिशेने निघालेल्या तमाम वारकऱ्यांना राज्यातील महायुती सरकारने मोठा दिलासा दिला आहे. आषाढी एकादशीनिमित्त टाळ-मृदुंगाचा गजर करत, हरीनाम जपत दिंड्या पंढरीकडे निघाल्या असून स्वतःच्या गाड्यांनी आणि एसटी महामंडळाच्या बसेसनेही हजारो वारकरी पंढरपूर गाठत असतात. या भाविकांसाठी राज्य सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. गतवर्षीप्रमाणे यंदाही आषाढी वारीसाठी येणाऱ्या- जाणाऱ्या भाविकांना टोलमाफी देण्यात आली आहे. बुधवार, ३ जुलै ते २१ जुलैपर्यंत ही टोलमाफी असणार आहे.

कोकणातील गणेशोत्सवाप्रमाणे पंढरपूर येथे आषाढीच्या वारीसाठी जाणाऱ्या वारकऱ्यांच्या वाहनांना टोल माफ करण्याचा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गतवर्षी जाहीर केला होता. कोरोनामुळे दोन वर्षे खंड पडल्यामुळे गतवर्षी वारकऱ्यांच्या संख्येत मोठी वाढ झाल्याचं दिसून आली होती. याचा विचार करून सरकारने गतवर्षी वारीसाठी येणाऱ्या- जाणाऱ्या वाहनांना टोलमाफी केली होती. आता, यंदाही राज्य सरकारने टोलमाफीचा निर्णय घेतला असून आजपासूनच पंढरपूरकडे जाणाऱ्या वाहनांना टोलमाफीचा लाभ मिळणार आहे.

हे ही वाचा:

“संविधानाची प्रत घेऊन उड्या मारणाऱ्यांचा संविधान दिनाला होता विरोध”

भाजपाचा विरोध झुगारून नवाब मलिक अजित पवारांच्या बैठकीत

पुण्यात झिका रुग्णांची संख्या सातवर

शेअर बाजाराची ऐतिहासिक झेप; सेन्सेक्सची ८०,००० पार उसळी

वारीत सहभागी असलेल्या वारकऱ्यांच्या वाहनांसाठी परिवहन विभागातून आवश्यक स्टीकर्स दिले जाणार आहेत. ३ जुलै ते २१ जुलै या कालावधीत पंढरपूरला जाणाऱ्या आणि पंढरपूरहून गावी जाणाऱ्या सर्वच वाहनांना ही सवलत असणार आहे. दरम्यान, गरज पडल्यास सुरक्षित व सुरळीत वाहतूकीसाठी वारीतील वाहने सोडून अवजड वाहनांना वारी मार्गावर बंदी घालण्याच्या सूचनाही मुख्यमंत्र्यांनी दिल्या आहेत. महाराष्ट्र राज्यातून पांढरपूरकडे येणारे सर्व पथकर नाक्यांवर उपरोक्त कालावधीत पथकर माफी नसलेल्या महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या बसेसनाही पथकरातून सूट देण्याच्या सूचना राज्य शासनाने दिल्या आहेत.

Exit mobile version