तिरुपती लाडू प्रकरण; सर्वोच्च न्यायालयाच्या सुनावणीपर्यंत सरकारकडून एसआयटी चौकशीला ‘फुल स्टॉप’

३ ऑक्टोबर रोजी होणार सुनावणी

तिरुपती लाडू प्रकरण; सर्वोच्च न्यायालयाच्या सुनावणीपर्यंत सरकारकडून एसआयटी चौकशीला ‘फुल स्टॉप’

आंध्र प्रदेश सरकारने तिरुपती लाडू बनवण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या तुपातील कथित भेसळीची चौकशी तात्पुरती थांबवली आहे. या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाची सुनावणी ३ ऑक्टोबर रोजी होणार आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या पुढील सुनावणीपर्यंत सरकारने चौकशी स्थगित केली आहे. दरम्यान, तिरुपती मंदिरातील प्रसादाचा मुद्दा राजकीय वादाचा विषय बनल्याने सर्वोच्च न्यायालयाने सरकारला खडे बोल सुनावल्यानंतर एक दिवसानंतर ही घटना घडली.

आंध्रचे सर्वोच्च पोलीस द्वारका तिरुमला राव म्हणाले की, तपासाची निष्पक्षता राखण्यासाठी “सावधगिरीचे पाऊल” म्हणून हा निर्णय घेण्यात आला आहे. सर्वोच्च न्यायालयात सुरू असलेली सुनावणी पाहता, आम्ही सध्या तपास थांबवला आहे. आमच्या पथकाने विविध तपासण्या केल्या आहेत, काही लोकांचे जबाब नोंदवले आहेत आणि प्राथमिक तपास केला आहे, असे अधिकारी म्हणाले.

हे ही वाचा : 

महाराष्ट्रात फक्त देशी गायीलाच राज्यमातेचा दर्जा का?, जर्सी गायीला का नाही?

लैंगिक छळवणूक प्रकरणी नायर रुग्णालयातील डीनची बदली!

एआयएक्ससीची विमाने एआयएक्स एअर ऑपरेटर प्रमाणपत्रावर हस्तांतरित

लाडकी बहीण योजना : सेवा शुल्क कपात केला तर कारवाई

या आठवड्याच्या सुरुवातीला, एसआयटीने तिरुमला येथील पिठाच्या गिरणीची तपासणी केली जेथे लाडू तयार करण्यासाठी वापरण्यापूर्वी तूप साठवले जाते, याच तुपाचा वापर लाडू बनवण्यासाठी केला जातो, जो दरवर्षी लाखो भाविकांना प्रसाद म्हणून वाटला जातो.

२५ सप्टेंबर रोजी या प्रकरणी एफआयआर नोंदवण्यात आला होता आणि या प्रकरणाच्या चौकशीसाठी २६ सप्टेंबर रोजी एसआयटीची स्थापना करण्यात आली होती. दरम्यान, आंध्र सरकारने आता ही चौकशी थांबवली आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या पुढील सुनावणीनंतर सरकारची भूमिका काय असेल हे पाहावे लागेल.

Exit mobile version