बहराइच हत्या प्रकरणातील आरोपी बिर्याणी खाऊन सुटतील…

हत्या झालेल्या रामगोपाल मिश्राच्या नातेवाईकांचा आरोप

बहराइच हत्या प्रकरणातील आरोपी बिर्याणी खाऊन सुटतील…

उत्तर प्रदेश पोलिसांनी गुरुवारी (१७ ऑक्टोबर ) बहराइचमध्ये झालेल्या चकमकीनंतर तालिब आणि सरफराजला अटक केली आहे. दोघे आरोपी पळण्याच्या तयारीत असताना पोलिसांनी गोळ्या घातल्या, ज्या दोघांच्या पायाला लागल्या आणि त्यांना ताब्यात घेण्यात आले. मात्र, या कारवाईवर राम गोपालचे कुटुंबीय आणि ग्रामस्थ समाधानी नाहीत.

बहराइचच्या पोलिस अधीक्षक वृंदा शुक्ला यांनी सांगितले की, या चकमकीत एकूण ५ आरोपींना अटक करण्यात आली आहे. या सर्वांवर राष्ट्रीय सुरक्षा कायद्यानुसार (NSA) कारवाई करण्यात येणार आहे. आरोपी तालिब आणि सरफराजच्या चकमकीनंतर आणि ५ आरोपींना अटक केल्यानंतर राम गोपालच्या कुटुंबीयांनी पोलिसांची कारवाई असमाधानकारक असल्याचे वर्णन केले आहे.

हे ही वाचा : 

पंतप्रधान नरेंद्र मोदी पुढील आठवड्यात रशियाला जाणार

सद्गुरू जग्गी वासुदेव यांना सर्वोच्च न्यायालयाचा दिलासा

जम्मू-काश्मीरच्या शोपियानमध्ये दहशतवाद्यांकडून एका गैर-स्थानिकाची हत्या!

अदानींना १०८० एकर जागा दिल्याचा कॅबिनेट निर्णय आदित्य ठाकरेंनी दाखवावा

राम गोपालची विधवा पत्नी रोली मिश्रा यांनी गुरुवारी (१७ ऑक्टोबर ) एक व्हिडिओ जारी केला. या व्हिडिओमध्ये रोली मिश्रा यांनी पोलिसांवर लाच घेतल्याचा आणि त्यांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप केला आहे. व्हिडिओमध्ये रोली मिश्रा यांनी म्हटले आहे की, “त्यांना नक्कीच पकडले गेले आहे, परंतु त्यांना मारले गेले नाही. “आम्हाला दाखवण्यात आले आहे की, त्यांच्या पायावर गोळी मारण्यात आली आहे”.

राम गोपालचे चुलत भाऊ किशन मिश्रा म्हणाले की, ज्या प्रकारे माझ्या भावाची हत्या केली गेली, त्या प्रमाणे केवळ आरोपींच्या पायावर गोळी मारून अटक करणे हा न्याय नाही, तो न्याय मानता येणार नाही. आता आरोपी सरफराज आणि त्याचे कुटुंब आरामात तुरुंगात दिवस घालवतील आणि काही दिवसांनी बिर्याणी खाऊन सुटतील, असे किशन मिश्रा म्हणाले.

 

Exit mobile version