टीडीपी नेते गांडी बाबाजींचा वायएसआर काँग्रेसवर हल्लाबोल

तिरुपती प्रसादमचे प्रकरण

टीडीपी नेते गांडी बाबाजींचा वायएसआर काँग्रेसवर हल्लाबोल

तेलुगू देसम पार्टीचे (टीडीपी) नेते गांडी बाबजी यांनी वायएसआर काँग्रेस पक्षावर (वायएसआरसीपी) श्री व्यंकटेश्वर मंदिरातील पवित्र प्रसाद – ‘तिरुपती प्रसादम’ मध्ये प्राण्यांच्या चरबीचा कथित वापर केल्याबद्दल आक्षेप घेतला आणि म्हटले की पक्षाने ‘लोभासाठी’ बेकायदेशीर कामे केली.

शुक्रवारी एएनआयशी बोलताना ते म्हणाले, मागील वायएसआरसीपी सरकारने पैशाच्या लोभापोटी सर्व बेकायदेशीर कामे केली. त्यांनी लोकांच्या जीवनाचा आणि भावनांचा विचार केला नाही. ते पुढे म्हणाले की, सरकार या प्रकरणाची चौकशी करून यात सहभागी असलेल्या व्यक्तींचा शोध घेईल.

हेही वाचा..

धारावीत तणाव; मशिदीचा अनधिकृत भाग तोडण्यास विरोध, गाड्या फोडल्या

वडोदराजवळ रेल्वे घसरण्यासाठी कट; ट्रॅकच्या फिश प्लेट ठेवल्या पेरून

इस्रायलने हिजबुल्लाच्या कमांडरला अचूक टिपले

आंध्रमध्ये चंद्राबाबूंचे गोविंदा गोविंदा!

आम्ही सत्तेत आल्यानंतर मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी या विषयाची चौकशी केली, तेव्हा त्यांना ते प्रदूषित तूप असल्याचे आढळून आले. याला कोण जबाबदार आहे हे शोधणे हे सरकारचे कर्तव्य आहे, असे ते म्हणाले.

आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी मागील युवाजन श्रमिका रयथू काँग्रेस पक्षाच्या (वायएसआरसीपी) कार्यकाळात तिरुपतीच्या श्री व्यंकटेश्वर मंदिरात अर्पण केल्या जाणाऱ्या तिरुपती लाडूच्या तयारीत प्राण्यांच्या चरबीसह निकृष्ट घटकांचा वापर केल्याचा दावा केल्यानंतर हे वक्तव्य आले आहे.

तत्पूर्वी, आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री पवन कल्याण यांनी सांगितले की, तिरुपतीच्या तिरुमला मंदिरात दिलेल्या तिरुपती लाडू प्रसादामध्ये प्राण्यांच्या चरबीच्या कथित वापराच्या वादामुळे धक्का बसला आहे. त्यांनी ‘सनातन धर्म संरक्षण मंडळ’ स्थापन करण्याचे आवाहन केले. याचा मंदिरांचे पावित्र्य जपण्यासाठी उपयोग होणार आहे.

“आम्ही दुखावलो आहोत आणि धक्का बसला आहे. जेव्हा कोणतीही बांधिलकी नसलेली, मूल्य नसलेली आणि मंदिराच्या पावित्र्याचा आदर नसलेल्या लोकांनी जबाबदारी घेतली तर असेच होते. हे फक्त प्रसादाचे नाही, कदाचित दारू आणि मांसाहाराचा पुरवठा केला जात असेल, लोक तिथे पार्टी करत होते, असे पवन कल्याण यांनी एएनआयला सांगितले.

Exit mobile version