30.6 C
Mumbai
Wednesday, May 14, 2025
घरविशेषतहव्वुर राणाचा धक्कादायक खुलासा

तहव्वुर राणाचा धक्कादायक खुलासा

Google News Follow

Related

२६/११ मुंबई दहशतवादी हल्ल्याचा मास्टरमाइंड म्हणून ओळखला जाणारा तहव्वुर हुसेन राणा याने मुंबई क्राईम ब्रांचच्या चौकशीत धक्कादायक दावा केला आहे. त्याने या हल्ल्यात आपला काहीही सहभाग नसल्याचा निर्वाळा दिला असून संपूर्ण जबाबदारी आपल्या बालपणीच्या मित्रावर – डेव्हिड कोलमन हेडलीवर टाकली आहे. अधिकाऱ्यांनी सांगितलं की, राणाने चौकशीत स्वतःला निर्दोष ठरवत म्हटलं की, २६/११ हल्ल्याशी त्याचा काहीही संबंध नाही. या संपूर्ण हल्ल्यासाठी त्याने डेव्हिड हेडलीला जबाबदार धरलं आहे. राणाचं म्हणणं आहे की, हल्ल्याच्या कटात त्याचा काही सहभाग नव्हता.

चौकशीदरम्यान राणाने हेही सांगितलं की तो दिल्लीत, मुंबईत आणि केरळमध्येही गेला होता. जेव्हा अधिकाऱ्यांनी त्याला केरळच्या दौऱ्याचं कारण विचारलं, तेव्हा त्याने सांगितलं की, तो तिथे काही ओळखीच्या लोकांना भेटण्यासाठी गेला होता. त्याने त्या ओळखीच्या व्यक्तीचं नाव आणि पत्ता देखील एजन्सीला दिलं आहे. आता क्राइम ब्रांच राणाच्या या दाव्यांची शहानिशा करण्याच्या तयारीत आहे आणि लवकरच एक तपास पथक केरळला रवाना होणार असल्याची शक्यता आहे.

हेही वाचा..

पोप फ्रान्सिस यांच्यावर आज अंत्य संस्कार

बुलंदशहरमधून चार पाकिस्तानी महिला परतल्या

पहलगाम हल्ला : अमृतसरमध्ये बाजार बंद

भिक्षेकरी आणि बेघरांसाठी सामाजिक न्याय विभागाचे चिंतन

गौरतलब आहे की, तहव्वुर राणाला अमेरिकेतून प्रत्यार्पण करून भारतात आणण्यात आलं आहे. एनआयए आणि नॅशनल सिक्युरिटी गार्ड (NSG) यांच्या टीमने त्याला लॉस एंजेलिसहून खास विमानाने भारतात आणलं. अमेरिकेत राणाने प्रत्यार्पण थांबवण्यासाठी अनेक कायदेशीर प्रयत्न केले होते, ज्यात अमेरिकेच्या सुप्रीम कोर्टात दाखल केलेली आपत्कालीन याचिकाही होती. मात्र, सर्व याचिका फेटाळल्यानंतर प्रत्यार्पण शक्य झालं. भारताच्या परराष्ट्र मंत्रालय आणि गृह मंत्रालयाने अमेरिकन अधिकाऱ्यांबरोबर मिळून ही प्रक्रिया पूर्ण केली.

एनआयएने राणाच्या प्रत्यार्पणासाठी वर्षानुवर्षे प्रयत्न केले. त्यांनी एफबीआय, यूएस डिपार्टमेंट ऑफ जस्टिस (USDOJ) आणि इतर एजन्सींसोबत समन्वय साधला होता. राणावर लश्कर-ए-तैयबासोबत मिळून २६/११ हल्ल्याच्या कटात सक्रिय सहभागाचा आरोप आहे. २६ नोव्हेंबर २००८ रोजी मुंबईवर दहशतवादी हल्ले झाले होते. १० दहशतवाद्यांनी ताज हॉटेल, ओबेरॉय ट्रायडेंट, छत्रपती शिवाजी टर्मिनस आणि नरीमन हाऊससह अनेक ठिकाणी हल्ला केला होता. या हल्ल्याने संपूर्ण देश हादरून गेला होता. राणावर या हल्ल्याची योजना तयार करण्यात लश्कर-ए-तैयबाला मदत केल्याचा आरोप आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

113,000चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
248,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा