28 C
Mumbai
Friday, September 20, 2024
घरविशेषपत्राचाळ प्रकरण: फडणवीसांचे नाव घेण्यासाठी दिली होती धमकी

पत्राचाळ प्रकरण: फडणवीसांचे नाव घेण्यासाठी दिली होती धमकी

स्वप्ना पाटकरांचा आरोप

Google News Follow

Related

पत्रा चाळ घोटाळा प्रकरणातील साक्षीदार स्वप्ना पाटकर यांनी ईडीला पत्र लिहित गंभीर आरोप केले आहेत. पत्रा चाळ जमीन प्रकरणात त्यांनी त्यांचा जबाब बदलावा यासाठी त्यांना धमकी दिली जात असल्याचे पत्रात नमूद करण्यात आले आहे. या प्रकरणात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे नाव घेण्यासाठी धमकी दिली जात असल्याचा आरोपही स्वप्ना पाटकर यांनी केला आहे.

पत्राचाळ जमीन घोटाळा प्रकरणातील साक्षीदार स्वप्ना पाटकर यांनी ईडीच्या पश्चिम विभागाच्या अतिरिक्त संचालकांना पत्र लिहिलं आहे. यात त्यांनी आपल्याला वारंवार धमक्या दिल्या जात असल्याचं म्हटलं आहे. पत्राचाळ घोटाळा प्रकरणात मी साक्ष दिली आहे. या साक्षीतील माझे जबाब बदलावेत, यासाठी धमकावलं जात आहे, असा मजकूर असणारं पत्र स्वप्ना पाटकर यांनी लिहिले आहे.

स्वप्ना पाटकर यांनी पत्रात काय म्हटले आहे?

“मी स्वप्ना पाटकर, नमूद केलेल्या पत्त्यावर गेल्या सुमारे २० वर्षांपासून माझ्या कुटुंबासह राहत आहे. संदर्भित प्रकरणातील मी साक्षीदार आहे. २७ ऑगस्ट २०२४ रोजी दुपारी ३.१३ वाजता मला कॉल आला. फोन उचलताच समोरील व्यक्तीने विचारले की, मी वर्तमानपत्र पाहिले आहे का? त्यानंतर त्याने मला सांगितले की, मला एका पत्रावर स्वाक्षरी करायची आहे जे आठवडाभरात ईडी कार्यालयात सादर केले जाईल, जर मी त्या पत्रावर सही केली नाही तर कॉलवर असलेला व्यक्ती माझ्यावर बलात्कार करून माझे तुकडे करेल. हा कॉल आल्यावर, मी वर्तमानपत्र शोधले आणि मला संदर्भित प्रकरणात दिलेली विधाने मागे घेण्यास सांगणारे एक पत्र सापडले आणि ‘महाराष्ट्र टाइम्स’ या मराठी वृत्तपत्रात एक फसवणूक आढळून आली. संदर्भासाठी दोन्हीच्या छायाप्रती जोडल्या आहेत. शिवाय पडताळणीसाठी ओरिजनल कागदपत्रेही सादर केली जातील.

कॉलरने मला पत्रावर स्वाक्षरी करण्यास सांगितले ज्यात असे नमूद केले आहे की, खासदार आणि एका राजकीय पक्षाचे नेते संजय राऊत यांच्याविरुद्ध संदर्भित प्रकरणांमध्ये मी दिलेली विधाने मागे घेण्यात आली आहेत आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दबावाखाली येऊन ही विधाने देण्यात आली आहेत.

मी तुमच्या निदर्शनास आणून देऊ इच्छिते की, संदर्भित प्रकरणातील आरोपी आणि त्याचे दलाल/गुंड हे साक्षीदाराला सतत धमकावत असतात आणि ते इतरांसोबतही करत असतील. तपासादरम्यान दिलेले माझे म्हणणे बदलण्यासाठी मला सतत धमकावले जात आहे, तसेच काही जमीन आणि मालमत्ता आरोपी संजय राऊत आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या नावे करण्यासाठी दबाव आणला जात आहे.

सदर आरोपीला तपास यंत्रणेने अटक केली होती आणि रिमांडची मागणी केली होती, तेव्हा मी माझ्या वकिलांच्या माध्यमातून विशेष पीएमएलए न्यायालयात अर्ज सादर केले होता. त्या अर्जात मी आधीच्या धमकीच्या घटनांचा उल्लेख केला होता आणि ते पुढे चालू राहण्याची भीतीही व्यक्त केली होती.

आरोपीची जामिनावर सुटका झाल्यानंतर अशा अनेक घटना घडल्या आहेत ज्याची तक्रार मी याआधी तुमच्या कार्यालयात आणि स्थानिक पोलिसांना वेळोवेळी दिली आहे. या प्रकरणातील आरोपी हा संसद सदस्य आहे, तसेच तो भ्रष्टाचार, फसवणूक आणि फसवणुकीच्या प्रकरणात आरोपी आहे ज्याची मी साक्षीदार आहे. हीच बाब लक्षात घेऊन या गुन्ह्याचा निर्णायक तपास आवश्यक आहे आणि त्यामुळे आपणास नम्रपणे विनंती करण्यात येते की, या प्रकरणाचा त्वरित तपास करावा.

मुंबईतील गोरेगाव येथे सिद्धार्थ नगरमध्ये ६७२ घरांच्या पुनर्विकासासाठी रहिवाशांनी म्हाडा आणि बिल्डरसोबत करार केला होता. २००८ साली पत्राचाळ पुनर्विकास प्रकल्प सुरू झाला. म्हाडा, गुरूआशिष बांधकाम कंपनी आणि रहिवाशांमध्ये या घरांच्या पुनर्विकासासाठी तीन पार्टी करार झाला. १३ एकरपैकी साडेचार एकरवर मूळ रहिवाशांना घरं दिली जातील आणि उर्वरित भागात म्हाडा आणि बिल्डर विक्री करेल असंही ठरलं. पण, पुढे जमिनी गुरुआशिष बिल्डर आणि अधिकाऱ्यांनी परस्पर खासगी बिल्डरांना विकल्याचं समोर आले आणि आणि हा प्रकल्प रखडला.

हे ही वाचा:

केदारनाथमध्ये बिघडलेले हेलीकॉप्टर उचलून नेताना दोर तुटला आणि…

प. बंगालमध्ये पॉक्सोची ४८,६०० प्रकरणे प्रलंबित तरीही अतिरिक्त फास्ट ट्रॅक न्यायालये कार्यान्वित नाहीत

कानाच्या शस्त्रक्रियेसाठी भूल दिल्यानंतर महिला पोलिसाचा मृत्यू?

पॅरिस पॅरालिम्पिक २०२४: नेमबाज मनीष नरवालने रौप्य पदकावर कोरले नाव !

तसेच यात १ हजार ३४ कोटी रुपयांची फसवणूक संबंधित बिल्डरने केल्याची तक्रारही दाखल झाली. पत्राचाळ रहिवाशांनी यासंदर्भात म्हाडाकडे तक्रार केली. म्हाडा आणि खेरवाडी पोलिसांनी याप्रकरणाची चौकशी सुरू केली. ईडीकडूनही याप्रकरणाची चौकशी करण्यात आली. तपासादरम्यान, उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांना ईडीने पत्राचाळ प्रकरणात अटक केली होती. सध्या ते या प्रकरणात जामिनावर बाहेर आहेत.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
178,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा