रामनवमीच्या शुभ दिवशी अभिजीत मुहूर्तावर श्रीरामलल्लाच्या कपाळावर सूर्य तिलक झाला. सुमारे चार मिनिटांसाठी हा दुर्मिळ संयोग साधला गेला. जगभरातील लोकांनी या अद्वितीय क्षणाचे साक्षीदार होण्याचा मान मिळवला. सूर्य तिलकाच्या वेळी मंदिरात आरती करण्यात आली. त्याआधी काही वेळ मंदिराचे दरवाजे बंद ठेवण्यात आले. गर्भगृहातील लाइट्स बंद करण्यात आल्या, जेणेकरून सूर्य तिलक स्पष्टपणे दिसू शकेल.
शनिवारी सूर्य तिलकाच्या यशस्वी आयोजनासाठी अंतिम ट्रायल घेण्यात आली होती. आठ मिनिट चाललेल्या या ट्रायलवेळी इसरो, आयआयटी रुडकी आणि आयआयटी चेन्नई येथील तज्ज्ञ उपस्थित होते. रामनवमीच्या दिवशी दुसऱ्यांदा श्रीरामलल्लाच्या कपाळावर सूर्य तिलक करण्यात आला. याचे थेट प्रसारण देश-विदेशात दाखवण्यात आले. गेल्या वर्षीही रामनवमीच्या दिवशी श्रीरामलल्लाला सूर्य तिलक करण्यात आला होता. ट्रस्टने निर्णय घेतला आहे की पुढील २० वर्षे हा सूर्य तिलक नियमितपणे केला जाईल.
हेही वाचा..
जाणून घ्या…अमृतसर पोलिसांची दहशतवादी नेटवर्कविरोधात मोठी कारवाई
जबलपूरमध्ये मुस्लिमांनी कसे केले वक्फ विधेयकाचे स्वागत
बिहारमध्ये रामभक्तांची अलोट गर्दी
संभलच्या चामुंडा देवी मंदिरात का येते हिमाचलहून दिव्य ज्योत
श्रीरामजन्मोत्सवावर सूर्य तिलकाचे खास धार्मिक महत्त्व आहे. याची प्रेरणा रामचरितमानस मधील चौपाईतून मिळते ‘मास दिवस कर दिवस भा मरम न जानइ कोइ, रथ समेत रबि थाकेउ निसा कवन बिधि होइ’ या चौपाईमध्ये गोस्वामी तुलसीदास लिहितात की, भगवान रामाचा जन्म जेव्हा झाला, तेव्हा सूर्यदेव अयोध्येला पोहोचले आणि इतके मोहित झाले की, एक महिना अयोध्येतच राहिले. त्या काळात अयोध्येत रात्रच झाली नाही. भगवान राम हे सूर्यवंशी होते, म्हणजेच सूर्यदेव हे त्यांचे कुलदैवत होते.
अयोध्येत रामनवमीच्या पर्वासाठी जिल्हा प्रशासनाने विशेष तयारी केली आहे. रामकथा पार्क येथे सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात येणार आहेत. विविध विभागांकडून प्रदर्शनेही लावण्यात येणार आहेत. शिवाय, श्रद्धाळूंच्या सुरक्षेसाठी विशेष उपाययोजना करण्यात आल्या आहेत. राममंदिर, कनक भवन, हनुमानगढी, रामपथ इत्यादी ठिकाणी झोनमध्ये विभागणी करण्यात आली आहे. गरज भासल्यास आंतरर्गत वाहतूक डायवर्जन केले जाणार आहेत. सीसीटीव्ही आणि ड्रोनच्या माध्यमातून सतत देखरेख ठेवली जात आहे.