27.5 C
Mumbai
Sunday, April 27, 2025
घरविशेषराहुल गांधींच्या संविधानावरील वक्तव्याबद्दल सुधांशु त्रिवेदींनी हाणला टोला

राहुल गांधींच्या संविधानावरील वक्तव्याबद्दल सुधांशु त्रिवेदींनी हाणला टोला

Google News Follow

Related

काँग्रेसचे खासदार आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी त्यांच्या संविधानावर दिलेल्या वक्तव्यामुळे ट्रोल होत आहेत. भाजपने त्यांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया देताना सांगितले की, “राहुल गांधी संविधान खिशात ठेवतात, पण ते वाचत नाहीत.” भाजप खासदार सुधांशु त्रिवेदी यांनी म्हटले की, “राहुल गांधींना हेही माहित नाही की संविधान केव्हा तयार झालं आणि केव्हा लागू झालं. त्यामुळेच ते म्हणतात की संविधान हजारो वर्षांपूर्वीचं आहे.”

राहुल गांधींनी जनतेला उद्देशून म्हटलं, “लोक म्हणतात की हे संविधान १९४७ मध्ये लिहिलं गेलं. पण मी त्यांना सांगतो की नाही, हे संविधान हजारो वर्ष जुनं आहे. राहुल गांधींच्या या वक्तव्यावर प्रतिक्रिया देताना भाजप खासदार सुधांशु त्रिवेदी यांनी मंगळवारी आयएएनएस या वृत्तसंस्थेशी बोलताना सांगितलं, “राहुल गांधी संविधान खिशात ठेवतात, पण त्यांच्या वक्तव्यावरून स्पष्ट होतं की त्यांनी ते कधीच वाचलेलं नाही. ते म्हणतात की संविधान १९४७ मध्ये लागू झालं नाही. त्यांना हे माहिती नाही की संविधान २६ नोव्हेंबर १९४९ रोजी तयार झालं आणि २६ जानेवारी १९५० रोजी लागू झालं.

हेही वाचा..

भावाला अडकवण्यासाठी थेट मुख्यमंत्री योगींना बॉम्बने उडवून देण्याची धमकी!

युनूस यांच्या सत्तेची लालसा बांगलादेशला जाळतेय!

उपमुख्यमंत्री पवन कल्याण यांचा ७ वर्षांचा मुलगा आगीच्या कचाट्यात!

बांगलादेशाची अफगाणिस्तानच्या दिशेने वाटचाल? KFC, Pizza Hut, Bata वर जबर हल्ले

भाजप खासदार म्हणाले, “राहुल गांधी म्हणतात की संविधान हजारो वर्ष जुनं आहे. मला समजत नाही की हे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेल्या संविधानाविषयी अज्ञान आहे की त्याची अवमानना आहे. एक गोष्ट मात्र मला आनंददायक वाटली, ती म्हणजे ही तीच काँग्रेस आहे जी म्हणायची की भारत हजारो वर्षांपूर्वी अस्तित्वात नव्हता, तो मुघल काळात अस्तित्वात आला. पण आता किमान ते मान्य करत आहेत की भारत खरंच हजारो वर्ष जुना आहे. मी त्यांना आठवण करून देऊ इच्छितो की हा देश जगातील एकमेव जिवंत प्राचीन संस्कृती आहे. ही ती भूमी आहे जिथे ज्ञान सर्वप्रथम निर्माण झालं. दुर्दैवाने काँग्रेसने नेहमीच देशाच्या समृद्ध आणि प्राचीन वारशाला नाकारलं आहे.

सुधांशु त्रिवेदी पुढे म्हणाले, “पंतप्रधान मोदींनी अमृत काळात पुढील २५ वर्षांचा अजेंडा सादर करताना सांगितलं होतं की ही २५ वर्षे येत्या हजार वर्षांच्या भारताचे भविष्य ठरवतील. भाजप हे ते लोक आहेत जे हजारो वर्ष जुन्या परंपरेतून प्रेरणा घेतात, आणि दुसरीकडे राहुल गांधी आहेत, जे संविधान खिशात ठेवतात पण संविधान केव्हा बनलं, केव्हा लागू झालं याचा नीटसा ज्ञान नसतो.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

113,000चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
245,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा