33 C
Mumbai
Friday, April 11, 2025
घरविशेषमोदींनी उद्घाटन केलेल्या 'पंबन रेल्वे ब्रिज'ची वैशिष्ट्ये बघा

मोदींनी उद्घाटन केलेल्या ‘पंबन रेल्वे ब्रिज’ची वैशिष्ट्ये बघा

Google News Follow

Related

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी रामेश्वरममध्ये ‘पंबन रेल्वे पुला’चे उद्घाटन केले. हा भारताचा पहिला वर्टिकल लिफ्ट ब्रिज आहे. याची पायाभरणी २०१९ मध्ये स्वतः पंतप्रधान मोदींनी केली होती. २.०८ किलोमीटर लांब हा पूल रामेश्वरम (पंबन बेट) आणि तामिळनाडूतील मंडपम यांना जोडतो. पंतप्रधान मोदींनी रिमोट डिव्हाइसचा वापर करून पुलाचा वर्टिकल लिफ्ट स्पॅन चालवला, ज्यामुळे तळाशी एक तटरक्षक जहाज सहज जाऊ शकले. ही नवनिर्मित रचना भारताची स्वदेशी अभियांत्रिकीतील असाधारण प्रगती दर्शवते.

पंतप्रधान मोदींनी चेन्नईहून रामेश्वरम ते तांबरम दरम्यानच्या नवीन ट्रेन सेवेलाही हिरवा झेंडा दाखवला. यामुळे प्रादेशिक कनेक्टिव्हिटी वाढेल आणि प्रवाशांसह यात्रेकरूंना सुलभ प्रवास शक्य होईल. जरी तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम.के. स्टालिन नीलगिरी येथे पूर्वनिर्धारित व्यस्ततेमुळे कार्यक्रमाला उपस्थित राहू शकले नाहीत, तरी कार्यक्रमात राज्यपाल आर.एन. रवि, केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव, राज्य मंत्री थंगम थेन्नारासु, आणि भाजपचे नेते के. अन्नामलाई, सुधाकर रेड्डी, एच. राजा, नैनार नागेंथिरन यांच्यासह रामनाथपुरमचे जिल्हाधिकारी सिमरनजीत सिंह कहलों उपस्थित होते.

हेही वाचा..

हरिद्वारमध्ये बेकायदा मजारवर कसा चालवला बुलडोझर

अनंत अंबानींच्या वाढदिवशी अनोखा उपक्रम, काय केले जाणून घ्या…

मोदींच्या श्रीलंका दौऱ्याबद्दल काय म्हणाले स्थानिक

‘सूर्य तिलका’ला योगींनी काय उपमा दिली ?

यापूर्वी, पंतप्रधान मोदींनी सोशल मीडियावर एक आध्यात्मिक अनुभव शेअर करत म्हटलं, थोड्या वेळापूर्वी श्रीलंकेतून परतताना राम सेतूचे दर्शन झाले. आणि हे दिव्य संयोगाने अयोध्येत सूर्य तिलक होत असतानाचे क्षण होते. दोघांचेही दर्शन होऊन मी धन्य झालो. प्रभू श्रीराम आपल्याला एकत्र ठेवणारी शक्ती आहेत. त्यांचा आशीर्वाद सदैव आपल्या सर्वांवर राहो. पंबन ब्रिज भविष्यातील गरजा लक्षात घेऊन डिझाइन करण्यात आला आहे. हे हाय-स्पीड ट्रेनसाठी योग्य डबल ट्रॅक ब्रिज आहे, ज्यामुळे ते तांत्रिकदृष्ट्या प्रगत मानले जाते.

या पुलामध्ये १८.३ मीटर लांबीचे ९९ स्पॅन आणि ७२.५ मीटर लांबीचा एक वर्टिकल लिफ्ट स्पॅन आहे. हा जुना पुलापेक्षा ३ मीटर उंच असून मोठ्या जहाजांना सहज मार्ग मोकळा होतो. पुलाच्या संरचनेत ३३३ पाइल्स आहेत आणि हे इतकं मजबूत आहे की वर्षानुवर्षे रेल्वे आणि समुद्रमार्गाची सुरक्षितता राखू शकेल. पुलामध्ये अँटी-करोजन तंत्रज्ञान, पॉलीसिलॉक्सेन पेंट, उन्नत स्टेनलेस स्टील आणि फायबर रीइन्फोर्स्ड प्लास्टिक चा वापर करण्यात आला आहे, जे याच्या दिर्घकालीन टिकाऊपणाचे लक्षण आहे. याच्या निर्मितीने भारताच्या डिझाइन व सर्टिफिकेशन क्षेत्रातील तांत्रिक श्रेष्ठतेचा पुरावा दिला आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

113,000चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
241,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा