राहुल गांधींच्या वक्तव्याने काँग्रेसचा चेहरा उघड !

अमित शहा यांची सडकून टीका

राहुल गांधींच्या वक्तव्याने काँग्रेसचा चेहरा उघड !

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी बुधवारी काँग्रेस खासदार राहुल गांधी यांच्या परदेश दौऱ्यांदरम्यान ‘भारतविरोधी’ आणि ‘देशविरोधी’ वक्तव्य केल्याबद्दल त्यांच्यावर सडकून टीका केली. राहुल गांधींनी “नेहमीच देशाच्या सुरक्षेला धोका दिला आहे आणि भावना दुखावल्या आहेत, असे शाह म्हणाले.

देशात फूट पाडण्याचा कट रचणाऱ्या शक्तींच्या पाठीशी उभे राहणे आणि देशविरोधी वक्तव्ये करणे ही राहुल गांधी आणि काँग्रेस पक्षाची सवय बनली आहे. मग ते JKNC च्या राष्ट्रविरोधी आणि J&K मधील आरक्षणविरोधी अजेंड्याला पाठिंबा देत असेल किंवा भारतविरोधी विधाने करत असेल. परदेशी प्लॅटफॉर्मवर राहुल गांधींनी नेहमीच देशाच्या सुरक्षेला धोका निर्माण केला आहे आणि भावना दुखावल्या आहेत, असे त्यांनी एकस्वर म्हटले आहे.

प्रादेशिकता, धर्म आणि भाषिक भेदांच्या धर्तीवर तेढ निर्माण करण्याच्या काँग्रेसच्या राजकारणाला राहुल गांधींच्या विधानाने उघडे पाडले आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी आरक्षणाच्या मुद्द्यावरून गांधी यांच्यावर ताशेरे ओढले असून देशातील आरक्षण संपुष्टात आणण्याचे बोलून राहुल गांधींनी काँग्रेसचा आरक्षणविरोधी चेहरा पुन्हा एकदा समोर आणला असल्याचे म्हटले आहे.

त्यांच्या मनात जे विचार होते ते शब्दांच्या रूपात निघून गेले. मला राहुल गांधींना सांगायचे आहे की जोपर्यंत भाजप आहे तोपर्यंत कोणीही आरक्षण रद्द करू शकत नाही किंवा देशाच्या सुरक्षेशी कोणी गडबड करू शकत नाही. राहुल गांधी आरक्षण तसेच भारतात धार्मिक स्वातंत्र्यावर बोलल्याच्या एका दिवसानंतर अमित शहा यांचे एक्सवर पोस्ट केली आहे. यानंतर राजकीय वातावरण गरम झाले आहे.

वॉशिंग्टन डी.सी.मधील जॉर्जटाउन युनिव्हर्सिटीमध्ये संवादात्मक सत्राला संबोधित करताना राहुल गांधी म्हणाले, आम्ही आरक्षण रद्द करण्याचा विचार तेव्हाच केला पाहिजे जेव्हा भारत एक न्याय्य ठिकाण होईल. आणि भारत सध्या न्याय्य ठिकाण नाही.

Exit mobile version