काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी भारताच्या गुणवत्ता व्यवस्थेवर टीका केली आणि ती ‘संपूर्ण सदोष असल्याचे म्हटले. दलित, ओबीसी आणि आदिवासींना शिक्षण आणि प्रशासनात प्रवेश मिळविण्यात येणाऱ्या संघर्षांवर प्रकाश टाकत त्यांनी सध्याच्या व्यवस्थेच्या निष्पक्षतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. प्राध्यापक सुखदेव थोरात यांच्या मुलाखतीत राहुल गांधी बोलत होते.
राहुल गांधी म्हणाले, मेरीट एक पूर्णपणे सदोष संकल्पना आहे. कारण काही लोकांसाठी याचा अर्थ असा आहे की आपली शिक्षण व्यवस्था किंवा आपली नोकरशाही प्रवेश व्यवस्था दलित, ओबीसी आणि आदिवासींसाठी न्याय्य आहे. हे पूर्णपणे चुकीचे आहे कारण ते या समुदायांशी सांस्कृतिकदृष्ट्या अजिबात जोडलेले नाहीत. म्हणून संपूर्ण कथा ही उच्चवर्णीय कथा आहे. गुणवत्तेची ही कल्पना प्रत्यक्षात एक ‘अन्याय्य कल्पना’ आहे, असे राहुल गांधी म्हणाले.
राहुल गांधीनी या मुलाखतीचा व्हिडीओ सोशल मिडीयावर शेअर करत बाबासाहेबांचे स्वप्न आजही अपूर्ण असून हा लढा आमच्या पूर्ण ताकदीने लढू असे लिहिले. राहुल गांधी ट्वीटकरत म्हणाले, ९८ वर्षांपूर्वी सुरू झालेला हिस्सा मिळवण्याचा लढा अजूनही सुरूच आहे. २० मार्च १९२७ रोजी बाबासाहेब आंबेडकरांनी महाड सत्याग्रहाद्वारे जातीभेदाला थेट आव्हान दिले. हा केवळ पाण्याच्या हक्कांसाठीचा लढा नव्हता, तर समानता आणि आदरासाठीचा लढा होता.
हे ही वाचा :
आयपीएलचे नऊ दिग्गज खेळाडू, जे आजही मैदान गाजवतायत!
‘भारताने १ अब्ज टन कोळसा उत्पादनाचा टप्पा ओलांडला’
युवराज सिंग डब्ल्यूसीएल सीझन २ मध्ये भारताचे नेतृत्व करणार
सुप्रसिद्ध शिक्षणतज्ज्ञ, अर्थतज्ज्ञ, दलित समस्यांवरील तज्ज्ञ आणि तेलंगणातील जात सर्वेक्षणावरील अभ्यास समितीचे सदस्य, प्रा. थोरात यांच्याशी या सत्याग्रहाचे महत्त्व चर्चा केली. या काळात, आम्ही दलितांच्या प्रशासन, शिक्षण, नोकरशाही आणि संसाधनांच्या उपलब्धतेसाठी सुरू असलेल्या संघर्षावरही सविस्तर चर्चा केली.
Rahul Gandhi says Merit is completely flawed and unfair idea.
This is Rahul Gandhi losing 90 elections is still leading Congress and only bootlickers get promotion in Congress, not people with Merit. pic.twitter.com/gIp6mILwk4
— Ankur Singh (@iAnkurSingh) March 20, 2025
जातीय जनगणना ही या असमानतेचे सत्य बाहेर आणण्याच्या दिशेने एक महत्त्वाचे पाऊल आहे, तर त्याचे विरोधक हे सत्य बाहेर येऊ देऊ इच्छित नाहीत. बाबासाहेबांचे स्वप्न आजही अपूर्ण आहे. त्यांचा लढा हा केवळ भूतकाळातील लढा नाही तर तो आजचाही लढा आहे – आम्ही तो आमच्या पूर्ण ताकदीने लढू, असे राहुल गांधी म्हणाले.
Shashtron me ise hi doglapan kaha gaya hai. pic.twitter.com/yvPbaa0grT
— BALA (@erbmjha) March 20, 2025