‘पंजाबचा टॉयलेट किंग’, मुख्यमंत्री भगवंत मान यांच्यासह नेते होतायेत ट्रोल!

सोशल मिडीयावर मिम्सचा पाऊस 

‘पंजाबचा टॉयलेट किंग’, मुख्यमंत्री भगवंत मान यांच्यासह नेते होतायेत ट्रोल!
पंजाब सरकारने नुकत्याच सुरू केलेल्या ‘शिक्षा क्रांती’ योजनेअंतर्गत शाळांमध्ये शौचालयांच्या दुरुस्तीसारख्या किरकोळ कामांसाठीही फलक लावण्याच्या निर्णयामुळे आता सोशल मीडियावर मीम्स आणि टीका सुरू झाली आहे. लोकांनी आम आदमी पक्षाच्या (आप) नेत्यांना ट्रोल करायला सुरुवात केली आहे आणि याला करदात्यांच्या पैशाचा अपव्यय म्हटले आहे. उद्घाटन झाले असो वा नसो, मुख्यमंत्री भगवंत मान आणि शिक्षणमंत्री हरजोत सिंग बैंस यांची नावे या फलकांवर ठळकपणे कोरलेली आहेत, तर स्थानिक आमदाराचे नाव त्यांच्या खाली लिहिलेले आहे.
सोशल मीडियावर दोन फलक व्हायरल होत आहेत. यातील एक घुनस, बर्नाला येथील शहीद शिपाई दलिप सिंग सरकारी वरिष्ठ माध्यमिक शाळेतील आहे. तर दुसरे भांगू, फाजिल्का येथील सरकारी स्मार्ट स्कूलमधील आहे. या फलकांवर शौचालय दुरुस्तीसारख्या छोट्या कामांच्या पायाभरणी आणि उद्घाटनाचाही उल्लेख आहे.
ट्विटरवरील “ट्रॅक्टर २ ट्विटर पंजाब” नावाच्या एका हँडलने सरकारच्या या उपक्रमाला करदात्यांच्या पैशाचा उघड अपव्यय म्हटले आहे. त्याने लिहिले, “विश्वास ठेवणे कठीण आहे की, आमदार शौचालय दुरुस्तीसाठीही पायाभरणी करत आहेत.” यावर प्रतिक्रिया देताना, गुरकिरत सिंग या वापरकर्त्याने लिहिले की, “प्रत्येक वेळी तेच मंत्री, तेच काम. हरजोत सिंग बैन्स खरोखरच ‘पंजाबचा टॉयलेट किंग’ बनण्याच्या शर्यतीत आहेत. हा विकास नाही तर भ्रम आहे.”
तथापि, काही वापरकर्त्यांनी या उपक्रमाचे समर्थन देखील केले आहे. एका वापरकर्त्याने लिहिले की, “शौचालये ही एक महत्त्वाची सुविधा आहे, विशेषतः मुलींसाठी. इतक्या छोट्या गोष्टीला अनावश्यकपणे मुद्दा बनवले जात आहे.”
हे ही वाचा : 
शेख हसिनांसह मुलगी आणि इतर १७ जणांविरुद्ध अटक वॉरंट जारी!
दहशतवादी तहव्वूर राणाचे प्रत्यार्पण आणि २०११ चे मोदींचे ट्वीट व्हायरल; काय आहे प्रकरण?
ट्रम्प यांच्या सवलतीनंतर भारतीय शेअर बाजार रुळावर; सेन्सेक्समध्ये उसळी
चीनला दणका; आयातीवरचा कर १२५ टक्के नव्हे, तर १४५ टक्के! कसा ते घ्या जाणून
दरम्यान, आणखी एका वापरकर्त्याने माणिक गोयल लिहिले की, “मोठ्या प्रकल्पांसाठी फलक लावणे ठीक आहे, परंतु अशा छोट्या कामांसाठी ते टाळले पाहिजे जेणेकरून पैसे वाचतील.” लोक हे देखील आठवण करून देत आहेत की जेव्हा भगवंत मान फक्त खासदार होते किंवा जेव्हा पंजाबमध्ये आप सत्तेत होते तेव्हा अशा फलकांना टाळले जात असे. त्यावेळी विकासकामात योगदान देणाऱ्यांची नावेही दगडी पाट्यांवर लिहिली जात नव्हती.
Exit mobile version