31 C
Mumbai
Monday, March 24, 2025
घरविशेषऔरंग्याची कबर हटविण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल

औरंग्याची कबर हटविण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल

कबरीला दिलेला राष्ट्रीय संरक्षित स्मारकाचा दर्जा हटविण्याची मागणी

Google News Follow

Related

राज्यात सध्या औरंगजेबाच्या कबरीवरून वाद निर्माण सुरू झाला आहे. याचे पडसाद राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनातही उमटल्याचे पाहायला मिळाले. तर, नागपूरमध्ये मोठा हिंसाचार उसळला होता. दगडफोडी, जाळपोळीच्या घटना घडल्या. या राड्यातील आरोपींवर कारवाई सुरू असतानाच आता हे प्रकरण मुंबई उच्च न्यायालयात पोहोचले आहे. शुक्रवारी उच्च न्यायालयात एक याचिका दाखल करण्यात आली. या याचिकेत औरंगजेबाच्या थडग्याला राष्ट्रीय स्मारक मानले जाऊ नये, अशी मागणी करण्यात आली आहे. औरंगजेबाची कबर पाडण्याची आणि भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभागाला राष्ट्रीय स्मारकांच्या यादीतून ही कबर वगळण्याचे निर्देश देण्याची मागणी केली आहे.

छत्रपती संभाजी नगरमधील खुलताबाद येथे औरंगजेबाची कबर आहे. या कबरीला आधीच्या सरकारने राष्ट्रीय संरक्षित स्मारकाचा दर्जा दिलेला आहे. औरंगजेबच्या कबरीला दिलेला राष्ट्रीय संरक्षित स्मारकाच्या दर्जाबाबत याचिका दाखल करण्यात आली आहे. हा दर्जा काढण्याची मागणी करणारी याचिका न्यायालयात दाखल करण्यात आली आहे.

केतन तिरोडकर नावाच्या व्यक्तीने मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली आहे. या याचिकेत औरंगजेबाची कबर पाडण्याची आणि भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभागाला औरंगजेबाची कबर राष्ट्रीय स्मारकांच्या यादीतून वगळण्याचे निर्देश देण्याची मागणी करण्यात आली आहे. कारण ती भारतीय पुरातत्व सर्वेक्षण कायदा, १९५८ च्या कलम ३ शी सुसंगत नाही.

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील औरंगजेबच्या कबरीला १९५२ मध्ये राष्ट्रीय संरक्षित स्मारक म्हणून घोषित करण्यात आले होते. यावर आता हिंदुत्ववादी संघटनांनी आक्षेप घेतला आहे. कबरीला राष्ट्रीय संरक्षित स्मारकाचा दर्जा देणे चुकीचे असल्याचे त्यांचे म्हणणे आहे.

हे ही वाचा : 

छत्रपती संभाजी महाराजांचा स्टेटस ठेवला म्हणून परभणीत तरूणाला मारहाण

नागपूर हिंसाचार: डेमोक्रॅटिक पार्टीच्या हमीद इंजिनियरसह युट्यूबर मोहम्मद शहजाद खानला अटक

उत्तर प्रदेशमध्ये सामुहिक बलात्कार, हत्या प्रकरणातील आरोपी चकमकीत ठार

बंगल्यात रोकड सापडलेल्या दिल्लीतील न्यायाधीशांचे साखर कारखाना बँक घोटाळ्यात नाव

‘छावा’ चित्रपटानंतर औरंग्याचे क्रूर रूप जनतेसमोर आल्याने त्याची कबर हटवण्यात यावी अशी मागणी जोर धरू लागली. या दरम्यान, समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमी यांनी औरंगजेबाचा उदोउदो केला नंतर टीकेची झोड उठताच त्यांनी आपले विधान मागे घेतले. दरम्यान, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही औरंगजेबाची कबर हटवण्याबाबत भाष्य करताना कायद्याच्या कक्षेत राहून काम करण्याचे सांगितले होते. तसेच मागील काँग्रेस सरकारने औरंगजेबाची कबर भारतीय पुरातत्व सर्वेक्षण (ASI) कडे सोपवली होती, असेही ते म्हणाले. छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज आणि भाजपा खासदार उदयनराजे भोसले यांनीही औरंगजेबाची कबर हटवण्याची मागणी केली होती. यानंतर बजरंग दल आणि विश्व हिंदू परिषद यांनीही या प्रकरणात उडी घेतली.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
237,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा