पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी जागतिक आरोग्य दिनानिमित्त देशवासीयांना आरोग्यदायी जीवनशैली स्वीकारण्याचे आणि लठ्ठपणापासून वाचण्याचे आवाहन केले आहे. त्यांनी सांगितले की, वैयक्तिक तंदुरुस्तीला प्राधान्य देणे हे भारताच्या विकसित राष्ट्र बनण्याच्या उद्दिष्टात मोलाची भूमिका बजावेल.
पंतप्रधान मोदींनी एक्सवर पोस्ट केले आहे की जागतिक आरोग्य दिनानिमित्त, चला आपण आरोग्यदायी जग घडवण्यासाठी आपली बांधिलकी व्यक्त करूया. आपले सरकार आरोग्यसेवेकडे लक्ष देत राहील आणि लोकांच्या भल्यासाठी विविध क्षेत्रांमध्ये गुंतवणूक करत राहील. उत्तम आरोग्य हे समृद्ध समाजाचे खरे आधारस्तंभ असते. एका व्हिडिओ संदेशात पंतप्रधानांनी आरोग्य हेच खरे सौख्य आणि खरे धन आहे ही जुनी म्हण वापरली आहे. भारतात वाढणाऱ्या लठ्ठपणाच्या समस्येबाबत चिंता व्यक्त केली आहे.
हेही वाचा..
वक्फ विधेयकाचे समर्थन केले, भाजपा नेत्याचे घर पेटवले
भूकंपापूर्वीच इशारा देईल ‘भूदेव’ अॅप
हरियाणा: पोलीस भरतीत अग्निवीरांना २० टक्के आरक्षण!
सपा नेता विनय तिवारींच्या कंपनीत भ्रष्टाचाराची ‘गंगोत्री’; ईडीचे छापे!
ते म्हणतात, आजकाल आपली जीवनशैलीच आपल्या आरोग्यासाठी एक मोठा धोका बनली आहे. अलीकडील एका अहवालानुसार २०५० पर्यंत ४४ कोटींहून अधिक भारतीय लठ्ठपणाने ग्रस्त असतील. ही चिंतेची बाब आहे आणि भविष्यात हे किती मोठं संकट ठरू शकतं, याचा आपण विचार केला पाहिजे. आरोग्यदायी खाण्याच्या सवयी अंगीकारणे आवश्यक आहे. स्वयंपाकात तेलाचा कमी वापर करणे, ही फक्त वैयक्तिक निवड नसून सामाजिक जबाबदारी देखील आहे.
पंतप्रधानांनी यावर एक सोपा उपाय सुचवला आहे. ते म्हणतात मी आज तुमच्याकडून एक वचन घेऊ इच्छितो. आपण सर्वांनी आपल्या स्वयंपाकात वापरल्या जाणाऱ्या तेलाच्या प्रमाणात १० टक्क्यांची घट करावी. हे लठ्ठपणा कमी करण्याच्या दिशेने एक मोठे पाऊल ठरेल. त्यांनी लोकांना आपल्या दिनचर्येत नियमित शारीरिक व्यायाम समाविष्ट करण्याचेही आवाहन केले. याशिवाय, आपल्याला व्यायाम हा आपल्या जीवनशैलीचा भाग बनवावा लागेल. आपण स्वतःला तंदुरुस्त ठेवले, तर ते विकसित भारताच्या दिशेने एक महत्त्वाचे पाऊल ठरेल, असे ते म्हणाले.