30 C
Mumbai
Saturday, July 6, 2024
घरविशेषपवार, ठाकरे, जरांगेंचे गलिच्छ राजकारण चालू देणार नाही!

पवार, ठाकरे, जरांगेंचे गलिच्छ राजकारण चालू देणार नाही!

ॲडव्होकेट गुणरत्न सदावर्ते यांनी ठणकावले

Google News Follow

Related

राज्यात मराठा आणि ओबीसी आरक्षणावरून राजकारण सध्या चांगलंच तापलं आहे. राज्यात सलोखा बिघडवण्याचे काम मंत्री छगन भुजबळ करत असल्याचा आरोप मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी केला होता. यावरून दोन्ही बाजूने आरोप-प्रत्यारोप सुरूच आहेत. तत्पूर्वी, राज्यात सामाजिक सलोखा बिघडवण्याचा काम मनोज जरांगे करत असून संविधानाला फासण्याचे काम त्यांनीच केल्याचा आरोप गुणरत्न सदावर्ते यांनी केला आहे. इंव्हॉल्युवेशन ऑफ कास्ट काय आहे? हे मनोज जरांगे पाटील यांना माहिती नाही. संविधान समजत नसेल तर राज्यात आरक्षणाचं गलिच्छ राजकारण करू दिल जाणार नाही, असे सदावर्ते म्हणाले आहेत.

ते म्हणाले की, हिंदू भाऊ नेहमी सर्वांना सोबत घेऊन चालतो. तो भारताच्या संविधानावर विश्वास ठेवतो. आज आपण म्हणत आहात की सलोखा म्हणजे काय. सलोखा म्हणजे संविधानाला तिलांजली द्यायची, संविधानाला निकाली करायच का?. संविधान समजत नसेल तर राज्यात आरक्षणाचं गलिच्छ राजकारण करू दिल जाणार नाही. राष्ट्रवादी शरद पवार गटाचे अध्यक्ष शरद पवार, उद्धव ठाकरे यांनी खुशाल आपल्या गोष्टी कराव्यात. तसेच मनोज जरांगे आम्ही सुद्धा मांड्या ठोकून संविधानाच्या भाषेने तयार आहोत. आमची ताकद ही संविधानाची आहे आणि जरांगे यांची ताकद ही अत्याचाराची आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात जरांगे यांची काही चालणार नसल्याचे गुणरत्न सदावर्ते म्हणाले.

हे ही वाचा:

“के सुरेश यांना नामनिर्देशित करणं हा काँग्रेसचा एकतर्फी निर्णय”

गावबंदीची उठाठेव कशाला? ओबीसींचे आंदोलन ‘जरांगे’ मार्गाने जायला नको…

संसदेत शपथ घेतल्यानंतर ओवैसींनी लगावले ‘जय पॅलेस्टाईन’चे नारे!

केजरीवालांचा मुक्काम तिहारमध्येचं; जामीन देण्याचा निर्णय उच्च न्यायालयाकडून रद्द!

ते पुढे म्हणाले, सामाजिक सलोखा बिघडवण्याचे काम दुसरे कोणी नाहीतर जरांगे करत आहेत. समाजात तेढ निर्माण करून संविधानाला सुद्धा एका बाजूला हरताळ फासण्याचे काम केले आहे. विखे पाटलांसारख्या लोकांमुळे एका दिवशी जात संपेल असे मनोज जरांगे म्हणाले होते. यावर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुस्तकाचा संदर्भ देत सदावर्ते म्हणाले, जात बद्दल बाबासाहेबांचे पुस्तक आहे त्याचे वाचन केल्यावरच ह्या गोष्टी समजतील. मनोज जरांगे यांनी काही वाचलेलंच नाहीये.

मनोज जरांगे यांची भूमिका म्हणजे एखाद्या चेंडू सारखी आहे. एक बाजूने फिट केल्यानुसार ते गुगली, स्टेट, हाल्फक्रीज अशाप्रमाणे चेंडू टाकणारा हा त्यांचा खेळाडू आहे. त्यामुळे खेळाडूची खेळापुरती चालते संविधान बदलण्यासाठी चालत नाही, असे सदावर्ते म्हणाले.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
163,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा