33 C
Mumbai
Monday, October 28, 2024
घरविशेषपंतप्रधान, मुख्यमंत्र्यांनी न्यायाधीशांच्या घरी कार्यक्रमात भाग घ्यायला हरकत नाही!

पंतप्रधान, मुख्यमंत्र्यांनी न्यायाधीशांच्या घरी कार्यक्रमात भाग घ्यायला हरकत नाही!

सरन्यायाधीश चंद्रचूड यांचे स्पष्टीकरण

Google News Follow

Related

सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश डी.वाय.चंद्रचूड यांनी गणेश पूजे दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितवरून पुन्हा एकदा भाष्य केले आहे. गणेश पूजेदरम्यानची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट ही सामान्य गोष्ट असल्याचे सरन्यायाधीश चंद्रचूड म्हणालेत. न्यायव्यवस्थेच्या पायाभूत सुविधांशी संबंधित मुद्द्यांवर चर्चा करण्यासाठी अशा बैठका अनेकदा होत असतात, पण यामध्ये न्यायालयीन निर्णयांवर चर्चा होत नाही, असे सरन्यायाधीश चंद्रचूड म्हणाले. रविवारी (२७ ऑक्टोबर) लोकसत्ता व्याख्यानमाला कार्यक्रमात सरन्यायाधीश चंद्रचूड बोलत होते.

सरन्यायाधीश चंद्रचूड म्हणाले, ‘न्यायालयीन बाबींना कोणत्याही चर्चेपासून दूर ठेवण्यासाठी न्यायाधीश आणि कार्यकारी प्रमुख यांच्यात पुरेशी परिपक्वता आहे.’ लोकशाही व्यवस्था आणि राजकीय व्यवस्थेतील आमची कर्तव्ये आम्हाला माहिती आहेत आणि कार्यकारिणीला आपली कर्तव्ये माहीत आहेत.

ते पुढे म्हणाले, राज्यांचे मुख्य न्यायाधीश आणि मुख्यमंत्री यांच्यात नियमित बैठका होत असतात, तशी बैठका घेण्याची राज्यांमध्ये परंपरा आहे. आता लोकांना काय वाटतं, का भेटतात?, पण न्यायालयीन चर्चेसाठी ते कधीही भेटत नाहीत.

हे ही वाचा : 

भारताच्या चिराग चिक्काराची सुवर्णझेप, ठरला दुसरा कुस्तीपटू!

संजय राऊत, नाना पटोलेंमध्ये जुंपली; राऊत म्हणतात, यादीत काँग्रेसची टायपिंग मिस्टेक

जम्मू-काश्मीरमधील अखनूरमध्ये पुन्हा एकदा लष्कराच्या वाहनावर गोळीबार; एका दहशतवाद्याचा खात्मा

…म्हणे फडणवीस हे दुश्मन नव्हे विरोधक!

जिल्ह्यांतील नवीन न्यायालयीन इमारती आणि न्यायाधीशांसाठी निवासस्थानांसह न्यायालयीन पायाभूत सुविधांच्या मुद्द्यावर सरन्यायाधीश चंद्रचूड म्हणाले, ‘यासाठी मुख्य न्यायाधीश आणि मुख्यमंत्र्यांची बैठक आवश्यक आहे. मी अलाहाबाद उच्च न्यायालयाचा मुख्य न्यायाधीश होतो. मी मुंबई उच्च न्यायालयाच्या प्रशासकीय समितीवर काम केले आहे. जेव्हा मुख्य न्यायाधीश म्हणून नियुक्ती केली जाते तेव्हा उच्च न्यायालयाचा मुख्य न्यायाधीश मुख्यमंत्र्यांकडे जातात, अशी राज्यात परंपरा आहे. तर पुढच्या वेळी मुख्यमंत्री मुख्य न्यायाधीशांना भेटायला जातात. अशा सर्व बैठकांचा वेगळा अजेंडा असतो.

ते पुढे म्हणाले, ‘उच्च न्यायालय आणि राज्य सरकारे यांच्यातील प्रशासकीय संबंध उच्च न्यायालयाच्या पारंपारिक कामकाजापेक्षा खूप वेगळे आहेत. हीच गोष्ट भारताचे सर्वोच्च न्यायालय आणि तत्कालीन सरकार यांच्यातील प्रशासकीय संबंधात केंद्रीय स्तरावर लागू होते, परंतु न्यायालयीन कामकाजावर त्याचा कोणताही परिणाम होत नाही, हे आपण समजून घेतले पाहिजे. ‘न्यायाधीशही लग्न समारंभ, सामाजिक कार्यक्रम आणि इतर कार्यक्रमात राजकीय नेत्यांना भेटतात, पण कामाबद्दल चर्चा करत नाहीत, असे सरन्यायाधीश चंद्रचूड म्हणाले.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
185,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा