30 C
Mumbai
Friday, July 5, 2024
घरविशेषमिझोराममधील मैतेई समुदाय भीतीमुळे स्थलांतर करण्याच्या तयारीत

मिझोराममधील मैतेई समुदाय भीतीमुळे स्थलांतर करण्याच्या तयारीत

हिंसा मणिपूरमध्ये भीतीचे वातावरण मिझोराममध्ये

Google News Follow

Related

मणिपूरमध्ये गेल्या दोन-तीन महिन्यांपासून हिंसाचार सुरु आहे. हा हिंसाचार सुरु असताना दोन महिलांना नग्न करून त्यांची धिंड काढल्याचा व्हिडिओ समोर आला होता. त्यानुसार देशभरातून संतप्त प्रतिक्रिया येऊ लागल्या. घटनेसंबंधित आतापर्यंत सहा आरोपीना पोलिसांनी अटक केली आहे. मात्र, या घटनेचे पडसाद मिझोराममध्ये पाहायला मिळाले. घटनेमुळे मिझोराम मधील मैतेई समुदायाने भीतीपोटी स्थलांतर करण्यास सुरुवात केली आहे. मणिपूर सरकारनेही तेथील परिस्थिती पाहता लोकांना हवाई मार्गाने आणण्याची ऑफर दिली आहे.  

यापूर्वी मणिपूरमध्ये दोन महिलांना नग्नावस्थेत त्यांची धिंड काढत त्यांच्यावर सामूहिक बलात्कार केल्याची घटना घडली होती. या घटनेमुळे देशभरातून संतप्त प्रतिक्रिया येऊ लागल्या. दोन महिलांना नग्न करून त्यांची रस्त्यावरून धिंड काढण्याचा व्हिडिओ समोर आला. हा व्हिडिओ मे महिन्यातील असून मागील काही दिवसापूर्वी सर्वत्र पसरला. त्यानंतर सर्वत्र खळबळ माजली. मणिपूर मध्ये घडलेल्या विकृत घटनेमुळे मिझोराम मधील मैतेई समुदाय भीतीमुळे मिझोरम सोडून दुसरीकडे स्थलांतर करण्यास सुरुवात केल्याचे म्हटले जात आहे. मणिपूर सरकारनेही तेथील परिस्थिती पाहता लोकांना हवाई मार्गाने आणण्याची ऑफर दिली आहे.  

हे ही वाचा:

इर्शाळवाडीतील दरडग्रस्त अनाथ मुलांना डॉ. गोऱ्हे यांनी दिला दिलासा

रक्तदान शिबिराने सुरू झाला सेवासप्ताह

खेड तालुक्यातील २८ गावांमधील ४४ वाड्या डेंजर झोनमध्ये

मणिपूरमध्ये नग्न महिलांची धिंड काढणाऱ्या पाचव्या आरोपीस अटक !

मिझोराममध्ये मिझो जमातीचे लोक राहतात. मिझो लोकांचे मणिपूरच्या कुकी आणि झोमी जमातींशी घट्ट वांशिक संबंध आहेत. मणिपूरमध्ये ज्या महिलांवर अत्याचार झाला त्या कुकी आणि झोमी जमातीच्या होत्या. त्यामुळे भीतीपोटी मिझोराम मधील मैतेई समुदाय मिझोरम सोडून दुसरीकडे स्थलांतर करण्यास सुरुवात केली आहे.  

अशा परिस्थितीत, मिझो नॅशनल फ्रंट या माजी दहशतवादी संघटनेची सहयोगी संघटना पीस एकॉर्ड एमएनएफ रिटर्नीज असोसिएशन (पीएएमआरए) ने शुक्रवारी एक निवेदन जारी केले की, ‘मिझोराममध्ये राहणाऱ्या मैतेई समुदायाच्या लोकांनी त्यांच्या सुरक्षेसाठी राज्य सोडले पाहिजे अशी धमकी दिली होती. मणिपूरमधील घटनेमुळे मिझो लोकांच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत, अशा परिस्थितीत मिझोराम आता मैतेई लोकांसाठी सुरक्षित नसल्याचे निवेदनात म्हटले आहे.मणिपूर सरकारनेही तेथील परिस्थिती पाहता लोकांना हवाई मार्गाने आणण्याची ऑफर दिली आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
163,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा