30 C
Mumbai
Friday, September 20, 2024
घरविशेषचार दहशतवादी ठार !

चार दहशतवादी ठार !

भारतीय लष्कराच्या कॅप्टनला वीर मरण

Google News Follow

Related

जम्मू काश्मीरच्या डोडामधील असार भागात सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक अजूनही सुरू आहे. या चकमकीत चार दहशतवादी ठार झाल्याची माहिती आहे. त्याचवेळी भारतीय लष्कराच्या ४८ राष्ट्रीय रायफल्सच्या एका कॅप्टनने आपले बलिदान दिले आहे. चकमक सुरु असताना शोधमोहीम दरम्यान परिसरात रक्ताचे डाग आढळून आले, त्यानंतर सुरक्षा दलांनी अधिक कारवाई सुरू केली. शोधमोहिमे दरम्यान सुरक्षा दलांनी एम ४ रायफल जप्त केली आहेत. याशिवाय दारूगोळा आणि रसद सामग्रीही जप्त करण्यात आली आहे. यासोबतच तीन बॅग्सही जप्त करण्यात आल्या आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, भारतीय लष्कराने दोडाच्या असार भागात शोध मोहीम सुरू केली होती. दरम्यान, याचदरम्यान दहशतवाद्यांनी गोळीबार सुरू केला. सर्च पथकाचे नेतृत्व करताना झालेल्या चकमकीत लष्कराचा एक कॅप्टन जखमी झाला. त्यानंतर त्यांना रुग्णालयात नेले असता उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. कॅप्टन दीपक सिंग असे हुतात्मा झालेल्या लष्कर कॅप्टनचे नाव आहे.

हे ही वाचा:

स्वातंत्र्यदिन सोहळ्यात महिला पंचायत प्रतिनिधी आणि लखपती दीदी असणार विशेष अतिथी !

आठवीच्या प्रश्नपत्रिकेत पाच पैकी चार प्रश्न इस्लामशी निगडीत

‘पाकिस्तान विलीन होईल किंवा नष्ट होईल’

“मनोज जरांगे हे बिनबुडाचा लोटा”

अधिकृत सूत्रांनी सांगितले की, हुतात्मा कॅप्टन दीपक यांनी आपल्या पथकाचे नेतृत्व करत दहशतवाद्यांचा खात्मा करण्यासाठी आपल्या जवानांना निर्देश देत राहिले. दोन्ही बाजुंनी झालेल्या गोळीबारात कॅप्टन दीपक यांना गोळी लागली. त्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, त्यांना वीर मरण आले. दरम्यान, सुरक्षा दल आणि जम्मू काश्मीर पोलिसांच्या संयुक्त पथकांची परिसरात शोधमोहीम सुरू आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
178,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा