कावड यात्रेच्या मार्गावरील खाद्यपदार्थांच्या दुकानावर मालकाचे नाव लिहा!

भाविकांमध्ये कोणताही संभ्रम निर्माण होऊ नये यासाठी निर्णय

कावड यात्रेच्या मार्गावरील खाद्यपदार्थांच्या दुकानावर मालकाचे नाव लिहा!

उत्तर प्रदेशात प्रसिद्ध अशा कावड यात्रेला सुरुवात झाली आहे. अशातच कावड यात्रेसंबंधित आता नवा नियम जारी करण्यात आला आहे. या आदेशानुसार कावड यात्रेच्या मार्गावरील प्रत्येक खाद्यपदार्थाच्या दुकानाच्या किंवा हातगाडीच्या मालकाला आपले नाव फलकावर लिहावे लागणार आहे, जेणेकरून या यात्रेदरम्यान कोणताही नवा वाद निर्माण होऊ नये.

यात्रेत सहभागी झालेल्या भाविकांमध्ये कोणताही संभ्रम निर्माण होऊ नये आणि त्यावरून आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी सुरू होऊ नयेत शिवाय कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी, यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे ही सूचना देण्यात आली आहे.

उत्तर प्रदेशात कावड यात्रेला सुरुवात झाली असून प्रशासनानेही बंदोबस्त सुरू केला आहे. दरम्यान, यात्रेदरम्यान कोणताही वाद होऊ नये म्हणून हा निर्णय घेण्यात आल्याचे मुझफ्फरनगरच्या एसएसपीचे म्हणणे आहे. मुझफ्फरनगरचे एसएसपी अभिषेक सिंह म्हणाले की, “आमच्या जिल्ह्यात २४० किमीचा कंवर मार्ग आहे. त्यात अनेक खाद्यपदार्थांची दुकाने आहेत. मग ती हॉटेल्स, ढाबे किंवा गाड्या असोत. कंवरियांना जिथे जिथे खाद्यपदार्थ खरेदी करता येतील तिथे त्यांच्या मालकांची किंवा कर्मचाऱ्यांची नावे नमूद करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. हे आवश्यक आहे जेणेकरून कोणत्याही कानवरियामध्ये कोणत्याही प्रकारचा गोंधळ होऊ नये आणि अशी परिस्थिती उद्भवू नये ज्यामुळे आरोप-प्रत्यारोप होतात आणि नंतर कायदा आणि सुव्यवस्थेची परिस्थिती निर्माण होते. तशा सूचना देण्यात आल्या असून प्रत्येकजण त्याचे सुरक्षितपणे पालन करत आहे.”

हे ही वाचा:

सुरतमध्ये ड्रग्जच्या कारखान्यावर छापा, २० कोटींचा कच्चा माल जप्त !

जम्मू-काश्मीरच्या डोडामध्ये पुन्हा चकमक; लष्कराचे दोन जवान जखमी

हाथरस चेंगराचेंगरीवर भोले बाबा म्हणतो, मृत्यू अटळ आहे, ‘आज ना उद्या मरायचे आहे’

गडचिरोली पोलीस आणि माओवाद्यांमध्ये चकमक, १२ माओवाद्याना कंठस्नान !

बुधवारीच मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी कंवर यात्रेसंदर्भात अधिकाऱ्यांची बैठक घेतली होती. त्यांना अनेक महत्त्वाच्या सूचना दिल्या. बैठकीनंतर मुख्यमंत्री योगी यांनी कंवर यात्रेबाबत लिहिले की, “उत्तर प्रदेश सरकार श्रद्धा, परंपरा आणि वारसा यांचा आदर आणि जतन करण्यासाठी वचनबद्ध आहे. त्याच अनुषंगाने अखंड भक्ती आणि समर्पणाचे प्रतीक असलेल्या पवित्र कंवर यात्रा सुरळीत, सुरक्षित आणि सोयीस्करपणे पार पाडण्यासाठी आवश्यक मार्गदर्शक सूचना अधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत. कंवरियांवर पुष्पवृष्टी करून त्यांचा सत्कार करावा. कंवर यात्रा मार्गांवर स्वच्छता, उत्तम प्रकाश व्यवस्था आणि मदत शिबिरे उभारण्यात यावीत तसेच मार्गांवर पिण्याच्या पाण्याचीही व्यवस्था करण्यात यावी.”

Exit mobile version