27 C
Mumbai
Friday, September 20, 2024
घरविशेषसत्ता आल्यास एक तासात दारूबंदी रद्द करणार

सत्ता आल्यास एक तासात दारूबंदी रद्द करणार

प्रशांत किशोर यांचा दावा

Google News Follow

Related

राजकीय रणनीतीकार प्रशांत किशोर यांनी म्हटले आहे की त्यांचा नवीन राजकीय पक्ष बिहारमध्ये सत्तेवर निवडून आल्यास “एक तासाच्या आत” दारूवरील बंदी रद्द करण्यात येईल. २ ऑक्टोबर रोजी जन सुराज या त्यांच्या पक्षाच्या लाँचिंगपूर्वी प्रसारमाध्यमांशी बोलताना प्रशांत किशोर म्हणाले की त्यांचा नवीन पक्ष “आपले सरकार बनवल्यानंतर एका तासात दारूवरील बंदी रद्द करेल”.

दारूबंदी कायदा म्हणजे नितीश कुमारांच्या धाकधूकशिवाय दुसरे काही नाही. प्रशांत किशोर यांनी सध्याची बंदी कुचकामी असल्याची टीका केली आणि दावा केला की यामुळे अल्कोहोलची बेकायदेशीर होम डिलिव्हरी झाली आहे आणि संभाव्य अबकारी महसुलात राज्याला २० हजार कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. त्यांनी नोकरशहा यांच्यावर अवैध दारूच्या व्यापारातून फायदा होत असल्याचा आरोपही केला.

हेही वाचा..

‘क्रिकेटचा फिवर शरीयाच्या विरोधात, तालीबान्यांकडून क्रिकेट बंदीची शक्यता’

चंदीगड ग्रेनेड स्फोट: दिल्लीतून दुसऱ्या आरोपीला अटक !

अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर डॅलसमध्ये डल्ला! हीच का काँग्रेसची लोकशाही?

अल्लाउद्दीनचा चिराग घासण्यासाठी ठाकरे सज्ज

किशोर म्हणाले की आपण नितीश कुमार आणि लालू प्रसाद यादव यांना बिहारच्या दुर्दशेसाठी जबाबदार असल्याचे पाहिले आहे. प्रशांत किशोर म्हणाले आपला राजकीय पक्ष जन सूराज हा २ ऑक्टोबर रोजी सुरू होणार आहे. पुढील वर्षी होणाऱ्या बिहार विधानसभा निवडणुकीत सर्व २४३ जागा लढवणार आहे.

 

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
178,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा