उत्तर प्रदेशातील मुरादाबादच्या बिलारी भागात पोलिसांनी एका बेकायदेशीर आधार कार्ड केंद्राचा पर्दाफाश केला आहे, या ठिकाणी परवाना न घेता आधार कार्ड बनवून अपडेट केले जात होते. छाप्यादरम्यान, पोलिसांनी केंद्राचा संचालक वाजिद मलिक याला अटक केली आणि घटनास्थळावरून बायोमेट्रिक मशीन, लॅपटॉप, प्रिंटर, आधार कार्डच्या डझनभर प्रती आणि इतर कागदपत्रे जप्त केली. मिळालेल्या माहितीनुसार, वाजिद मलिक हा सपा कार्यकर्ता आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, वाजिद मलिकवर संभल हिंसाचारानंतर शेकडो आधार कार्डमधील पत्ते आणि इतर ओळखपत्रे बदलल्याचा आरोप आहे. बेकायदेशीरपणे किती आधार कार्ड बदलण्यात आले? आणि त्यापैकी काहींचा वापर गुन्हेगारी कारवायांमध्ये झाला आहे का?, याचा तपास सध्या पोलिस करत आहेत.
हे बेकायदेशीर केंद्र बिलारी कोतवालीपासून थोड्या अंतरावर होते, जिथे वाजिद मलिक यूआईडीएआई ( UIDAI) नियमांचे उल्लंघन करून कोणत्याही नोंदणीशिवाय बनावट आधार कार्ड बनवत होता. पोलिसांनी नायब तहसीलदारांना बोलावून हे केंद्र सील केले.
हे ही वाचा :
लोकसभेत वित्त विधेयक २०२५ मंजूरीसाठी सार होणार
जनतेने कोण गद्दार आणि कोण खुद्दार दाखवून दिले, कामराने माफी मागावी!
तेजस्वी यादवांच्या मार्गातील मोठा अडथळा लालू यादवच
देवाने पुरुषांनाचं प्रथम निर्माण केले असावे, चुका पहिल्यांदाच होतात… डिंपल यादव असं का म्हणाल्या?
या प्रकरणी कडक कारवाईची मागणी स्थानिक भाजप कार्यकर्त्यांनी केली आहे. भाजप नेते म्हणतात की अशी बनावट आधार केंद्रे राष्ट्रीय सुरक्षेसाठी धोका आहेत आणि त्यांच्यावर कठोर कारवाई केली पाहिजे.
या रॅकेटमध्ये आणखी कोण कोण सामील आहे आणि ही बेकायदेशीर कृती कोणत्याही मोठ्या गुन्हेगारी नेटवर्कशी जोडलेली आहे का?, याचा शोध आता पोलिस घेत आहेत. संभल हिंसाचारानंतर आधार कार्डमध्ये बदल करण्याच्या घटनांमुळे प्रशासनाची चिंता वाढली आहे.
या घटनेमुळे आधार कार्ड प्रणालीच्या सुरक्षिततेवर आणि देखरेखीवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे, ज्यामुळे भविष्यात अशा घटना रोखण्यासाठी कठोर उपाययोजना करण्याची गरज अधोरेखित झाली आहे. या प्रकरणात पुढील तपास सुरू असून दोषींवर कठोर कारवाई केली जाईल, असे पोलिसांचे म्हणणे आहे.