जम्मू आणि काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात गुरुवारी (२७ मार्च) सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये झालेल्या नव्या चकमकीत चार पोलिस कर्मचारी जखमी झाले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, जुठाना येथील एका घनदाट जंगली भागात चार ते पाच दहशतवादी लपले होते आणि सुरक्षा कर्मचाऱ्यांच्या शोधमोहिमे दरम्यान चकमक सुरु झाली.
आजच्या चकमकीत सहभागी असलेले दहशतवादी हे रविवारी हिरानगरमध्ये झालेल्या गोळीबारानंतर पळून जाण्यात यशस्वी झालेले दहशतवादीच असल्याचा सुरक्षा यंत्रणांचा विश्वास आहे. पाकिस्तानच्या आंतरराष्ट्रीय सीमेजवळील सान्याल गावातील एका नर्सरीमधील ‘ ढोक ‘ – एका लहानशा कुंपणात – त्यांच्या उपस्थितीबद्दल गुप्तचर माहिती मिळाल्यानंतर एसओजीने ही कारवाई सुरू केली.
काल (२६ मार्च) दहशतवाद्यांच्या शोधात हिरानगरच्या सान्याल गावाजवळील जंगलात घेराबंदी करण्यात आली होती. ऑपरेशन दरम्यान डीजीपी नलिन प्रभात सतत आघाडीवर उपस्थित राहिले. डीजीपींनी पोलिस अधिकारी आणि स्टेशन प्रभारींसोबत बैठक घेत दहशतवाद्यांवर कारवाई करण्याच्या रणनीतींवर चर्चा केली. ते म्हणाले, दहशतवाद्यांना शोधा आणि त्यांचा खात्मा करा.
हे ही वाचा :
तुरीच्या १०० टक्के खरेदीला एमएसपीवर मंजुरी
चेंबूर, गोवंडीमधून १७ बांगलादेशी घुसखोरांना अटक
पंतप्रधान मोदींनी बांगलादेशला लिहिले पत्र; १९७१ च्या मुक्ती युद्धाची करून दिली आठवण
समीर वानखेडे यांच्यावर खोटे आरोप करणाऱ्या महिलेवर खटला दाखल
उत्तर काश्मीरमधील बारामुल्ला जिल्ह्यात सुरक्षा दलांनी दहशतवाद्यांचा एक अड्डा उद्ध्वस्त केला आहे. एका पोलिस अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी बारामुल्लाच्या नांबला वनक्षेत्रात सुरक्षा दलांनी शोध मोहीम सुरू केली. या मोहिमेत बारामुल्ला पोलिस, लष्कराच्या ४६ राष्ट्रीय रायफल्स (आरआर) आणि केंद्रीय राखीव पोलिस दलाच्या ५३ बटालियन सैनिकांचा समावेश होता.
या दरम्यान, एक इम्प्रोव्हायझ्ड एक्सप्लोझिव्ह डिव्हाइस (आयईडी), प्लास्टिक स्फोटके, एके-४७ रायफलचे १०४ राउंड, दोन एके-४७ मॅगझिन, दोन हँडग्रेनेड, एक कॉम्बॅट पाउच आणि दोन बॅगा जप्त करण्यात आल्या. याप्रकरणी शेरी पोलिस ठाण्यात एफआयआर दाखल करण्यात आला आहे.