बिहार भाजपाचे अध्यक्ष दिलीप जायसवाल यांनी मंगळवारी माध्यमांशी संवाद साधताना विविध मुद्द्यांवर आपली स्पष्ट मते मांडली. त्यांनी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे आणि तेजस्वी यादव यांच्या प्रस्तावित बैठकीवर, वक्फ कायदा विरोधात पश्चिम बंगालमध्ये झालेल्या हिंसाचारावर, एनडीएमधून जीतन राम मांझी यांच्या नाराजगीवर आणि पशुपति कुमार पारस यांच्या एनडीएशी नातं तोडण्यावर परखड प्रतिक्रिया दिल्या.
दिल्लीमध्ये होणाऱ्या खडगे-तेजस्वी बैठकीबाबत दिलीप जायसवाल म्हणाले, “काँग्रेस आणि राष्ट्रीय जनता दल (राजद) यांचे गठबंधन बेढब आहे. दोघांचं उद्दिष्ट एकमेकांना कमकुवत करण्याचं आहे. राजदला कधीही नकोय की काँग्रेस पुन्हा बिहारमध्ये आपले पाय पसरेल. काँग्रेसला वाटतं की ती राजदपेक्षा ‘मोठा भाऊ’ बनून बिहारच्या राजकारणात वर्चस्व गाजवेल. त्यांच्यात काहीच तालमेल नाही; हे फक्त निवडणुकीची गरज म्हणून बनलेलं गठबंधन आहे. हे म्हणजे मेढकांचं गठबंधन आहे, जे एका तळ्यात एकमेकांपेक्षा मोठं होण्याचा प्रयत्न करत आहेत.
हेही वाचा..
हरयाणातील जमीन गैरव्यवहार प्रकरणी रॉबर्ट वाद्रा आता ईडीच्या फेऱ्यात
लक्झरी घरांची विक्री २८ टक्क्यांनी वाढली!
जम्मू-काश्मीरच्या राजौरीमध्ये मिनी बस उलटली
वक्फ बिल संदर्भात पश्चिम बंगालमध्ये झालेल्या हिंसाचारावर आणि मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्याकडून मुस्लिम समाजातील नेत्यांशी होणाऱ्या भेटींवरही त्यांनी टीका केली. जायसवाल म्हणाले, “हिंदू समाजातील लोकांची हत्या होते, पण ममता बॅनर्जी त्यांच्या कुटुंबीयांना भेटायला जात नाहीत. त्या फक्त एका विशिष्ट वर्गातील लोकांशीच भेटत आहेत. त्यांना त्यांच्या सवयी बदलायला हव्यात.” एनडीएमधून जीतन राम मांझी नाराज असल्याच्या चर्चांवर ते म्हणाले, “मांझीजी खूपच आनंदी आहेत, आम्हालाही वाटतंय की ते आमच्यापेक्षा जास्त आनंदी आहेत. त्यांचा आनंद शब्दात मांडता येणार नाही.”
पशुपति कुमार पारस यांनी एनडीए सोडल्यावर जायसवाल म्हणाले, “एनडीएचं गठबंधन लोक जनशक्ति पार्टी (लोजपा) सोबत आहे. लोजपामध्ये जे कौटुंबिक वाद आहेत, त्याच्याशी आमचं काही देणं-घेणं नाही.”