28 C
Mumbai
Sunday, May 4, 2025
घरविशेषमंत्री हफीजुल हसन यांच्या विरोधात भाजपाचा 'आक्रोश मोर्चा'

मंत्री हफीजुल हसन यांच्या विरोधात भाजपाचा ‘आक्रोश मोर्चा’

Google News Follow

Related

झारखंड सरकारमधील अल्पसंख्याक कल्याण मंत्री हफीजुल हसन यांना मंत्रिमंडळातून बडतर्फ करण्याची मागणी करत गुरुवारी भाजपाच्या नेते आणि कार्यकर्त्यांनी रांचीतील शहीद चौक ते राजभवनदरम्यान ‘आक्रोश मोर्चा’ काढला. राज्याच्या इतर काही जिल्ह्यांमध्येही भाजपाच्या कार्यकर्त्यांनी हसन यांच्या विरोधात आंदोलन केले. भाजपाचा आक्षेप हसन यांच्या त्या वक्तव्यावर आहे, ज्यामध्ये त्यांनी इस्लामिक शरीयत कायद्यास संविधानापेक्षा श्रेष्ठ म्हटले होते.

रांचीतील शहीद चौकात सुरू झालेल्या मोर्चामध्ये भाजपाचे प्रदेशाध्यक्ष व विधानसभा विरोधी पक्षनेते बाबूलाल मरांडी, केंद्रीय महिला व बाल विकास मंत्री अन्नपूर्णा देवी, संरक्षण राज्यमंत्री व रांचीचे खासदार संजय सेठ, राज्यसभा खासदार दीपक प्रकाश, प्रदीप वर्मा, आमदार सी. पी. सिंह, नवीन जायसवाल, युवा मोर्चाचे अध्यक्ष शशांक राज यांच्यासह शेकडो कार्यकर्ते सहभागी झाले.

हेही वाचा..

वक्फ कायद्यामुळे मुस्लिम समाजाचा विकास

पीएनबी बँकेला बॉम्बने उडवण्याची धमकी

गांधी परिवार कायद्याच्यावर नाही

भारताकडून १०० देशांना संरक्षण उपकरणांची निर्यात

मोर्चामध्ये सहभागी लोकांच्या हातात संविधानाच्या प्रती होत्या. त्यांनी हफीजुल हसन यांची बडतर्फी आणि त्यांच्या विरोधात कारवाईच्या मागणीसाठी घोषणाबाजी केली. मोर्चा संपल्यानंतर भाजपाच्या शिष्टमंडळाने राज्यपाल संतोष कुमार गंगवार यांची भेट घेऊन निवेदन दिले. या निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, ‘‘झारखंड राज्य सरकार सध्या घटनात्मक संकटाच्या कालखंडातून जात आहे. संविधानाची शपथ घेऊन पदभार स्वीकारलेले मंत्री घटनात्मक मर्यादा धुडकावत आहेत. संविधानाचे अपमान करणारे, त्याचे उल्लंघन करणारे, शरिया कायद्याला संविधानापेक्षा वरचढ मानणारे मंत्री हफीजुल हसन यांना मंत्रिमंडळातून तातडीने हटवण्याचे निर्देश मुख्यमंत्री यांना द्यावेत.’’

या प्रसंगी बाबूलाल मरांडी म्हणाले की, झारखंडमध्ये हेमंत सोरेन सरकार संविधानाऐवजी शरीयत लागू करण्याचा कट रचत आहे. राहुल गांधी आणि हेमंत सोरेन हे वक्फ कायद्याच्या विरोधाच्या नावावर मुस्लिम मंत्र्यांकडून – हफीजुल अन्सारी आणि इरफान अन्सारी – संविधानविरोधी वक्तव्ये करून घेत आहेत. हे जनादेश आणि संविधानाचा अपमान आहे. झारखंडमध्ये शरीयत लागू करण्याचा डाव भाजप यशस्वी होऊ देणार नाही आणि बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानाचे पूर्ण ताकदीने रक्षण करेल.

या विधानाच्या विरोधात गुरुवारी झारखंडच्या अनेक जिल्ह्यांमध्ये भाजपाने निदर्शने केली. हफीजुल हसन यांनी अलीकडे एका चॅनेलशी बोलताना म्हटले होते, ‘‘शरीयत माझ्यासाठी मोठे आहे. आम्ही कुराण हृदयात ठेवतो आणि संविधान हातात. मुसलमान कुराण हृदयात आणि संविधान हातात घेऊन चालतो. म्हणून आम्ही आधी शरीयत धरतो, नंतर संविधान… माझा इस्लाम हेच सांगतो.’’ तथापि, नंतर त्यांनी या विधानावर सफाई देताना सांगितले की, त्यांचे विधान तोडून-मोडून सादर करण्यात आले. त्यांनी कधीही संविधानाच्या विरोधात काहीही बोललेले नाही.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

113,000चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
246,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा