पाकसरकारच्या हट्टीपणामुळे आम्ही सर्व २१४ लष्करी बंधकांना ठार मारले!

बलुच लिबरेशन आर्मीचा दावा

पाकसरकारच्या हट्टीपणामुळे आम्ही सर्व २१४ लष्करी बंधकांना ठार मारले!

पाकिस्तानच्या बलुचिस्तान प्रांतातील रेल्वे अपहरणाची घटना जगभरात चर्चेचा विषय बनली आहे. दरम्यान, बलुच बंडखोरांनी एक मोठा दावा केला आहे. बलुच बंडखोरांनी दावा केला की त्यांनी ओलीस ठेवलेल्या सर्व २१४ पाकिस्तानी सैनिकांना ठार केले आहे. यापूर्वी, पाकिस्तानी लष्कराने  सांगितले होते की ट्रेन अपहरणात ३१ लोकांचा मृत्यू झाला होता, ज्यात १८ सैनिक, ३ रेल्वे कर्मचारी आणि ५ नागरिकांचा समावेश होता. तसेच बीएलएने ओलीस ठेवलेल्या सर्वांना सुखरूप वाचवले. या कारवाई दरम्यान बीएलएच्या सर्व ३३ बंडखोरांना ठार मारण्यात आल्याचा दावा पाकिस्तानने केला होता.

बलुच बंडखोरांचे म्हणणे आहे की त्यांनी युद्धकैद्यांची देवाणघेवाण करण्यासाठी पाकिस्तानी सैन्याला ४८ तासांचा अल्टिमेटम दिला होता आणि तो शनिवारी (१४ मार्च) संपला. बंडखोरांनी पाकिस्तानी सैन्य आणि देशाच्या सरकारवर निर्लज्ज असल्याचा आरोप केला. बंडखोरांचे म्हणणे आहे की, नेहमीप्रमाणे, सेना आणि सरकारमुळे सैनिकांचा जीव गेला आहे. पाकिस्तानने अहंकार दाखवला आणि आणि आपल्या हट्टीपणावर अडून राहिले. या हट्टीपणामुळे आम्हाला आमचे हात पुढे करावे लागले.

हे ही वाचा : 

पंजाब: दुचाकीवरून आलेल्या दोन तरुणांचा मंदिरावर ग्रेनेड हल्ला!

हमासचे केले समर्थन; कोलंबिया विद्यापीठातील भारतीय विद्यार्थिनी अमेरिकेतून घरी परतली

‘छावा’ने रचला इतिहास, कमाईत पोहोचला तिसऱ्या क्रमांकावर

पश्चिम बंगालमध्ये हिंदूं देवतांच्या मूर्तींची तोडफोड, भाजपाने व्हिडीओ केला शेअर!

बीएलएने एका निवेदनात म्हटले, अल्टिमेटम देऊनही, लष्कर आणि सरकारने कोणतीही चर्चा केली नाही आणि जमिनीवरील वास्तवाकडेही डोळेझाक केली. लष्कर आणि पाकिस्तान सरकारच्या या हट्टीपणामुळेच सर्व २१४ ओलिसांना मारण्यात आले. याला ते लोक स्वतः जबाबदार आहेत. बीएलएने पुढे म्हटले की, बीएलए नेहमीच युद्धाच्या तत्त्वांनुसार आणि आंतरराष्ट्रीय कायद्यानुसार काम करत आले आहे, परंतु पाकिस्तान सरकारने आपल्या सैनिकांचे प्राण वाचवण्याऐवजी त्यांना युद्धात बलिदान देणेच योग्य मानले.

Exit mobile version