गिरिराज सिंह यांच्यावर हल्ला करणारा अटकेत

गिरिराज सिंह यांच्यावर हल्ला करणारा अटकेत

केंद्रीय मंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते गिरिराज सिंह जनता दरबारातून बाहेर येत असताना त्यांच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केल्याबद्दल मोहम्मद सैफी नावाच्या व्यक्तीला बेगुसराय पोलिसांनी शनिवारी अटक केली असून त्याची चौकशी सुरु आहे.

सैफी हा गिरीराज सिंह यांच्या दिशेने धावला आणि त्याने धक्काबुक्की करण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी सिंह यांच्या सुरक्षा कर्मचाऱ्यांनी त्याला पकडले. सिंह यांनी शनिवारी जनता दरबार आयोजित केला होता. बलिया उपविभाग कार्यालयाच्या आवारात हा दरबार आयोजित करण्यात आला होता.

हेही वाचा..

बांगलादेश: हिंदू शिक्षकांकडून जबरदस्तीने घेतले जात आहेत राजीनामे !

पॅरालिम्पिक: भारतीय नेमबाजांची चमक कायम, रुबिनाने कांस्यपदक जिंकले !

 

मिळालेल्या माहितीनुसार, केंद्रीय मंत्री जनता दरबारात लोकांच्या तक्रारी ऐकत असताना पांढरी टोपी घातलेला एक व्यक्ती तेथे आला. त्यांनी आधी जबरदस्तीने माईकचा ताब्यात घेतला. त्यानंतर तो बेताल वक्तव्ये करू लागला. त्यावेळी भाजप कार्यकर्त्यांनी आणि स्थानिकांनी त्याला रोखण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी गिरीराज सिंह यांच्या दिशेने धाव घेतली आणि त्यांना धक्काबुक्की करण्याचा प्रयत्न केला. मात्र, केंद्रीय मंत्री या हल्ल्यातून थोडक्यात बचावले आणि घटनास्थळी उपस्थित असलेल्या त्यांच्या सुरक्षा कर्मचाऱ्यांनी त्यांना वाचवले.

मोहम्मद सैफी असे आरोपीचे नाव आहे. तो वॉर्ड नगरसेवक आणि आम आदमी पक्षाचा माजी जिल्हाध्यक्ष असल्याचे सांगितले जाते. याबद्दल मंत्री गिरीराज सिंह म्हणाले, सैफी याने जबरदस्तीने माईक घेतला आणि असंबद्ध गोष्टी बोलण्यास सुरुवात केली. ते सहन करत आम्ही पुढे निघालो. तेव्हा तो माझ्यावर हल्ला करेल असे वाटले आणि त्याने असे वर्तन केले आणि मग मुर्दाबादच्या घोषणा देण्यास सुरुवात केली. मी अशा हल्ल्यांना घाबरत नाही आणि नेहमीच बोलत राहीन आणि समाजाच्या हितासाठी लढत राहीन.

सैफीच्या अटकेनंतर गिरीराज सिंह यांनी I.N.D.I. आघाडीचे नेते तेजस्वी यादव, अखिलेश यादव आणि राहुल गांधी यांचे वर्णन “वोट के सुदागर” असे केले. हल्लेखोराची ओळख पटल्यानंतर राहुल गांधी, तेजस्वी आणि अखिलेश यादव त्याच्या समर्थनार्थ बाहेर येतील, असे ते म्हणाले. ते पुढे म्हणाले की, देशात हिंदूंनी कधीही दंगली घडवल्या नाहीत. पण रामनवमी आणि दुर्गा विसर्जन यांसारख्या हिंदूंच्या सर्व धार्मिक मिरवणुकांवर हल्ले होतात. पण आता वेळ आली आहे…योगी जी बरोबर बोलले…अगर बातोगे तो कटोगे, अब हिंदू को भी एक होना पडेगा.

वक्फ बोर्डावरील एका प्रश्नाला उत्तर देताना गिरीराज सिंह म्हणाले की, वक्फ बोर्ड जमीन हडप मोहीम राबवत आहे. वाट्टेल ती जमीन बळकावतो. बेगूसरायसह संपूर्ण देशात हा प्रकार सुरू आहे. आपल्या वक्तव्याचा व्हिडिओ शेअर करण्याव्यतिरिक्त सिंह यांनी लिहिले की, “जे लोक त्यांची दाढी आणि टोपी पाहून त्यांचे लाड करतात आणि त्यांची काळजी घेतात त्यांनी आज पहावे की, बेगुसराय, बिहारसह संपूर्ण देशात लँड जिहाद-लव्ह जिहाद आणि जातीय तणाव कसा निर्माण केला जात आहे.

Exit mobile version