29 C
Mumbai
Friday, October 25, 2024
घरविशेषवक्फ बोर्ड कायदा संपवावा, जमिनीवर हिंदूंसाठी रुग्णालये, क्रीडांगण, महाविद्यालये बांधावीत!

वक्फ बोर्ड कायदा संपवावा, जमिनीवर हिंदूंसाठी रुग्णालये, क्रीडांगण, महाविद्यालये बांधावीत!

भाजप आमदार टी राजा यांची मागणी

Google News Follow

Related

महाराष्ट्रात एक लाख एकर जमीन वक्फ बोर्डाच्या मालकीची आहे.तसेच भारतात १० लाख एकर जमीन वक्फ बोर्डकडे आहे. पंतप्रधान व मुख्यमंत्र्यांनी वक्फ बोर्ड कायदा संपवून टाकावा आणि वक्फ बोर्डाच्या जमिनीवर हिंदूसाठी रुग्णालये, क्रीडांगण, महाविद्यालये, घरे बनवावी, अशी मागणी भाजप आमदार टी राजा यांनी केली आहे. भिवंडी तालुक्यातील पडघा येथे आयोजन करण्यात आलेल्या संत संमेलन व हिंदू धर्मसभेत ते बोलत होते.

या सभेत बोलताना टी राजा म्हणाले की, “महाराष्ट्रात मठ, मंदीर सुरक्षित नाहीत. छत्रपती शिवाजी महाराज यांनी ३७० किल्ले जिंकले, पण दुर्दैव म्हणजे शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रात १०० किल्ल्यांवर मशीद आणि दर्गा बनविण्यात आले आहेत. राज्यात विधानसभेच्या निवडणुका आहेत. त्यापूर्वी एकनाथ शिंदे यांना आवाहन आहे त्यांनी किल्ल्यांवरील अतिक्रमण हटवावे,” असे आवाहन टी राजा सिंह यांनी केले.

हे ही वाचा..

धक्कादायक: सलूनमध्ये मुस्लिम न्हाव्याने ग्राहकाच्या चेहऱ्याची केली ‘थुंकीने मालिश’!

अमर्याद संपत्ती गोळा करणाऱ्या वक्फ बोर्डाला चाप लावणार कोण?

‘तृणमूल काँग्रेसला मते मिळालेल्या भागातच विकासकामांसाठी पैसा’

त्रस्त पॅलेस्टाईनला भारताकडून आशा

महाराष्ट्रातील हिंदुत्त्ववादी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना कोणाची भीती आहे. सर्व हिंदू समाज त्यांच्या मागे उभा आहे.मुखमंत्र्यांनी मलंगगड मुक्त केला पाहिजे.मलंगगडला मच्छिंद्रनाथ महाराजांची समाधी. परंतु, तो दर्गा असल्याचे सांगून हिंदूंची थट्टा केली जात आहे.त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मलंगगड मुक्त केला पाहिज, अशी मागणी टी राजा यांनी केली.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
185,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा