मंत्रालयातील आत्महत्येचे प्रयत्न रोखण्यासाठी गृहविभागाची नवी नियमावली

मंत्रालयात येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला आता प्रवेश पास बंधनकारक

मंत्रालयातील आत्महत्येचे प्रयत्न रोखण्यासाठी गृहविभागाची नवी नियमावली

मंत्रालयात वारंवार होणारे आत्महत्येचे प्रयत्न आणि सुरक्षा जाळीवर केल्या जाणाऱ्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवरती गृह विभागाकडून नवीन मार्गदर्शक सूचना जारी करण्यात आली आहे. मागील काही दिवसांपूर्वी यवतमाळ जिल्ह्यामधील धरणग्रस्त नागरिकांनी मंत्रालयातील सुरक्षा जाळीवर उड्या मारून आंदोलन केले होते. या घटनेमुळे पोलिसांची तारांबळ उडाली होती आणि सुरक्षिततेचा प्रश्नही निर्माण झाला होता. ही घटना ताजी असताना काल एका कंत्राटी शिक्षकाने मंत्रालयातील सुरक्षा जाळीवरती उतरून आंदोलनाचा प्रयत्न केला होता. त्यानंतर आता या मार्गदर्शक सूचना जारी करण्यात आली आहे. त्यानुसार आता मंत्रालयात येणाऱ्या सर्व व्यक्तींना प्रवेश पास हा बंधनकारक असणार आहे. तर येत्या काही दिवसांत ऑनलाईन पासेस देण्याची सुविधा सुरू करण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत.

मंत्रालयामध्ये दर दिवशी ५,००० पेक्षा जास्त नागरिक आपल्या कामासाठी येतात शासनाच्या निदर्शनास आले आहे. त्यामुळे मंत्रालयात यापुढे किती व्यक्तींना प्रवेश देण्यात यावा याबाबत पोलीस उपायुक्त मंत्रालय सुरक्षा यांना सूचना देण्यात आल्या आहेत. एका महिन्याच्या आत त्यांच्याकडे याबाबतचा अहवाल मागवण्यात आला आहे.

हे ही वाचा:

रायफल स्पर्धेत सिफ्ट कौर सामराची सुवर्ण, आशी चौक्सीची कांस्य पदकाला गवसणी

एनआयएकडून खलिस्तानी- गँगस्टर्स विरोधात कारवाईचा बडगा

नाझी सैनिकाचा गौरव; कॅनडाच्या लोकसभा अध्यक्षाचा राजीनामा

इराकमध्ये लग्नसोहळ्यात लागलेल्या आगीत १०० ठार

काय आहेत नवीन सूचना?

Exit mobile version