अल्पवयीन विद्यार्थ्याने ब्लेडने कापून घेतले आणि हिंदू नेत्याने अपहरण केल्याचा बनाव रचला

अल्पवयीन विद्यार्थ्याने ब्लेडने कापून घेतले आणि हिंदू नेत्याने अपहरण केल्याचा बनाव रचला

उत्तर प्रदेशातील हरदोई येथील दानिश नावाच्या १५ वर्षीय शालेय विद्यार्थ्याने आपले अपहरण केले आणि एका हिंदू नेत्याने त्याला मारहाण केली तसेच त्याला ‘जय श्रीराम ‘ म्हणण्यास भाग पाडले. या मुलाने दावा केला की हिंदू नेत्यांने त्याला एका व्हॅनमध्ये नेले होते जिथे त्यांनी अल्पसंख्याक समुदायाशी संबंधित असल्याचा आरोप केला होता. त्यांच्या आधीच्या दाव्यानुसार नेत्याने त्याला ‘जय श्री राम’ म्हणण्यास भाग पाडले. तथापि, आता असे आढळून आले आहे की तो मुलगा खोटे बोलत होता आणि तो हिंदू नेत्यांवर कथित हल्ल्याचा खोटा आरोप करत होता.

हरदोई पोलिसांनी सोमवार, २१ ऑक्टोबर रोजी याकडे लक्ष वेधले आणि याला दुजोरा दिला की दानिश त्याच्या शाळेजवळील एका रिकाम्या इमारतीत लपला होता आणि ब्लेडने वार करून त्याचा हात दुखावला होता. नंतर त्याने आपल्या कुटुंबाबरोबर बोलताना असा दावा केला की हिंदू नेत्यांनी त्याचे अपहरण केले होते. त्यांनी त्याला ‘जय श्री राम’ म्हणण्यास भाग पाडले.

हेही वाचा..

पालिकेचे खबरी समजून तिघांना विवस्त्र करत गुप्तांगांना दिले शॉक

प्रभू श्रीरामांबद्दल आक्षेपार्ह पोस्ट टाकणाऱ्या अल्पवयीन मुस्लीम तरुणाला अटक

पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांच्या पत्नीला दिलासा, २६५ दिवसांनंतर तुरुंगातून सुटका!

इंडिगो, एअर इंडिया, विस्तारा, अकासा एअरच्या ८५ विमानांना धमक्या

दानिशने सुरुवातीला दावा केला की हिंदू नेत्यांनी त्याचे अपहरण केले आणि त्याच्यावर हल्ला केला. त्याने सांगितले की त्यांनी त्याला काही वेगवेगळ्या ठिकाणी नेले आणि नंतर त्याला त्याच्या शाळेजवळ सोडले. तथापि, पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला आणि मुलगा खोटे बोलत असल्याचे आढळले. तो १० वीत शिकतो. त्या दिवशी त्याने त्याचा गृहपाठ पूर्ण केला नव्हता आणि त्याला शाळेत जायचे नव्हते. पण तरीही त्याच्या आईने त्याला जाण्यास भाग पाडले. शाळा संपल्यानंतर तो जवळच्या रिकाम्या इमारतीत लपला आणि ब्लेडच्या सहाय्याने ३-४ ठिकाणी हातावर कापून घेतले. त्यानंतर तो घरी गेला आणि हिंदू नेत्यांनी त्याचे अपहरण केल्याचा दावा केला, असे पोलिसांनी सांगितले.

सत्य बाहेर आल्यानंतर मुलाने माफी मागितल्याचे हरदोई पोलिसांनी सांगितले. तो अल्पवयीन आहे आणि त्याचे भविष्य लक्षात घेऊन त्याला समुपदेशनानंतर सोडून देण्यात आले आणि कोणतीही कारवाई झाली नाही असे पोलिसांनी सांगितले.

तत्पूर्वी यावर्षी ऑगस्टमध्ये इस्लामवाद्यांनी एक व्हिडिओ व्हायरल केला होता. त्यामध्ये दावा केला होता की एका मुस्लिम व्यक्तीवर हिंदू नेत्यांनी ‘जय श्री राम’ चा उच्चार न केल्याबद्दल कथितपणे हल्ला केला होता. नंतर असे आढळून आले की व्हिडिओ जुना होता आणि हिंदू समुदायाला लक्ष्य करण्यासाठी चुकीने सोशल मीडियावर पसरवला जात होता. तसेच, हिंदू कथितरित्या मुस्लिम व्यक्तीवर हल्ला करत असल्याचे दर्शविण्यासाठी व्हिडिओचा आवाज बदलण्यात आला होता.

या प्रकरणात पोलिसांनी दानिशला इशारा दिला असून त्याच्यावर कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाही. दरम्यान दानिशनेही कबूल केले की आपण खोटे बोललो होतो.

Exit mobile version