कारगिल विजय दिवस: २५ वर्षांपूर्वी पाकिस्तानला चारी मुंड्या चित करून भारताने ‘कारगिल’ जिंकले!

भारतीय जवानांनी दाखवलेल्या शौर्याच्या स्मरणार्थ दरवर्षी २६ जुलै हा दिवस ‘कारगिल विजय दिवस’ म्हणून होतो साजरा

कारगिल विजय दिवस: २५ वर्षांपूर्वी पाकिस्तानला चारी मुंड्या चित करून भारताने ‘कारगिल’ जिंकले!

कारगिल विजय दिवस हा भारताच्या इतिहासातील एक महत्त्वाचा आणि अभिमानाचा दिवस आहे. १९९९ मध्ये कारगिल युद्धात भारताने पाकिस्तानवर मिळवलेल्या विजयाच्या आणि भारतीय जवानांनी दाखवलेल्या शौर्याच्या स्मरणार्थ दरवर्षी २६ जुलै रोजी हा दिवस कारगिल विजय दिवस म्हणून साजरा केला जातो. विशेष म्हणजे कारगिल युद्धात भारताने आपल्या विजयाचा ध्वज फडकावल्याच्या त्या घटनेला यंदाच्या वर्षी २५ वर्षे पूर्ण झाली आहेत.

आधीच्य युद्धात भारताने पाकिस्तानला धडा शिकवल्यानंतरही पाकिस्तानने १९९९ साली पुन्हा कुरापती केल्या. पण, भारताने मात्र यावेळी पाकिस्तानला चारी मुंड्या चित करत त्याच्या नांग्या ठेचल्या. जवळपास ६० दिवस चाललेले हे युद्ध २६ जुलै १९९९ रोजी संपलं. या युद्धाच्या विजयाच्या स्मरणार्थ भारतात हा दिवस ‘कारगिल विजय दिवस’ म्हणून साजरा केला जातो.

साल १९९९ मध्ये कारगिलच्या उंच शिखरांवर भारत आणि पाकिस्तान यांच्यात युद्ध झाले होते. पाकिस्तानी सैन्याने भारताच्या भूभागात घुसखोरी केली होती. भारतीय सैन्याने मोठ्या शौर्याने पाकिस्तानी घुसखोरांना पळवून लावलं होतं. या युद्धामध्ये आपले ५०० हून अधिक जवान हुतात्मा झाले होते. ऑपरेशन विजयचा भाग म्हणून टायगर हिलसह लष्कराच्या इतर सर्व चौक्यांवर भारताने कब्जा मिळवला.

हे ही वाचा:

पुण्यातील पूरस्थितीत बचावकार्यासाठी लष्कराचे जवान मैदानात

अनिल देशमुख पुरावे द्या, ३ तासाच्या आत तुमच्याही ऑडियो क्लिप्स जनतेसमोर आणू !

विहार व मोडक सागर तलाव ओसंडून वाहू लागले

हिंदू प्रशिक्षणार्थींना मुस्लिमांशी लग्न करण्यासाठी दबाव

१९७१ च्या भारत- पाकिस्तान युद्धानंतरही दोन्ही देशांच्या सैन्यात संघर्ष सुरूच होता. त्यात अणु चाचण्यांमुळे दोन्ही देशातील तणाव अजून वाढला होता. अशावेळी वातावरण शांत करण्यासाठी दोन्ही देशांनी फेब्रुवारी १९९९ मध्या लाहोर येथे घोषणापत्रावर स्वाक्षरी केली. या घोषणापत्रात काश्मिरच्या मुद्द्यावर दोन्ही देश चर्चेच्या माध्यमातून शांततेनं मार्ग काढतील असा करार करण्यात आला होता. मात्र, पाकिस्तानने सोयीस्करपणे हे विसरून पुन्हा कुरघोडी करायला सुरुवात केली. पाकिस्तानच्या सैन्याने आणि अर्ध-सैनिक दलातील जवानांनी भारतात घुसखोरी करायला सुरुवात केली. त्याला त्यांनी ‘ऑपरेशन बद्र’ असं नाव दिलं होतं. त्यानंतर भारत सरकार आणि लष्कराने ‘ऑपरेशन विजय’ची आखणी केली.

कसा होता कारगिल युद्धाचा घटनाक्रम?

Exit mobile version