29 C
Mumbai
Thursday, March 13, 2025
घरविशेषडलमऊ भागात होळीला रंगाऐवजी चक्क शोक पाळला जातो

डलमऊ भागात होळीला रंगाऐवजी चक्क शोक पाळला जातो

Google News Follow

Related

संपूर्ण देशात शुक्रवारी होळी मोठ्या उत्साहात साजरी केली जाईल. पण उत्तर प्रदेशातील रायबरेलीमध्ये एक असे क्षेत्र आहे, जिथे होळीच्या दिवशी लोक रंग आणि गुलाल उधळत नाहीत. होळीच्या दिवशी जिथे लोक रंगांची उधळण करत आनंद लुटतात, तिथे रायबरेलीच्या डलमऊ भागातील २८ गावांमध्ये शोक पाळला जातो. येथील लोक होळीच्या तीन दिवसांनंतर रंगोत्सव साजरा करतात.

डलमऊ नगर पंचायतीचे अध्यक्ष ब्रजेश दत्त गौड यांनी सांगितले की, या भागातील २८ गावांमध्ये होळीच्या दिवशी शोक पाळला जातो. ही परंपरा ७०० वर्षे जुनी आहे. राजा डाळदेव यांच्या बलिदानामुळे हा शोक आजही पाळला जातो. ते म्हणाले की, इ.स. १३२१ मध्ये राजा डाळदेव होळी साजरी करत होते, त्याच वेळी जौनपूरच्या राजा शाह शर्कीच्या सैन्याने डलमऊच्या किल्ल्यावर आक्रमण केले. राजा डाळदेव आपल्या २०० सैनिकांसह युद्धासाठी मैदानात उतरले. या लढाईत पखरौली गावाजवळ राजा डाळदेव वीरगतीला प्राप्त झाले.

हेही वाचा..

न्यूयॉर्कमध्ये फिलिस्तीन समर्थक आक्रमक

स्टारलिंक इंटरनेट भारतात आणण्यासाठी जिओचा स्पेसएक्सशी करार

डिजिटल व्यवहारात लक्षणीय वाढ !

३० दिवसांच्या युद्धबंदी कराराला युक्रेनची सहमती; रशिया काय निर्णय घेणार?

या युद्धात राजा डाळदेव यांच्या २०० सैनिकांनी आपल्या प्राणांची आहुती दिली, तर शाह शर्कीच्या सैन्यातील २,००० सैनिक मारले गेले. डलमऊ तहसील क्षेत्रातील २८ गावांमध्ये होळी आली की त्या ऐतिहासिक घटनेच्या आठवणी ताज्या होतात. त्यामुळे या गावांमध्ये लोक होळी साजरी करत नाहीत आणि तीन दिवस शोक पाळतात.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
235,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा