देशात २०१४ आणि २०१९ मध्ये स्वत:कडे भक्कम बहुमत असताना भाजपाने जे केले नाही, ते बहुमताचा आकडा नसताना वक्फ सुधारणा विधेयकाबाबत भाजपाने कसे जमवून आणले याबाबत विरोधक कोड्यात पडलेले आहेत. भाजपाच्या नेत्यांनी हे विधेयक मंजूर करून घेण्यासाठी अचूक रणनीती आखली होती. ती तंतोतंत अमलात आणण्यात पक्षाच्या नेत्यांना यश आले. विरोधक मात्र मुस्लीम समाज रस्त्यावर उतरेल, सरकारची नाकाबंदी करेल आणि शेतकरी आंदोलनानंतर जसे केंद्र सरकारने कृषी सुधारणा विधेयक मागे तसेच हे विधेयकही मागे घ्यावे लागेल या भ्रमात राहीले.