काँग्रेसवाल्यांना छत्रपतींची आठवण आली हेही नसे थोडके…

काँग्रेसवाल्यांना छत्रपतींची आठवण आली हेही नसे थोडके... | Dinesh Kanji | Chhatrapati Shivaji Maharaj

राजकोट येथील शिवछत्रपतींचा पुतळा कोसळल्याची दुर्दैवी घटना सोमवारी घडली. राज्यातील महायुतील सरकारला नामुष्की आणणारी ही घटना होती. अनेकांनी संताप व्यक्त केला, पराकोटीची नाराजी व्यक्त केली. परंतु सध्या जे काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते करतायत त्याला तमाशा शिवाय दुसरे काहीही म्हणता येणार नाही. गेली अनेक वर्षे, हा शाहु, फुले, आंबेडकर यांचा महाराष्ट्र आहे, या वाक्याने भाषणाची सुरुवात करणारे हे नेते. छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव जाणीवपूर्वक टाळणारे हे नेते, त्यांचा इतिहास पुसला जावा असे प्रयत्न करणारे हे नेते, आता छत्रपतींबाबत किती वाटते आणि किती नाही, अशी नौटंकी करतायत. उबाठाचे खासदार विनायक राऊत यांच्या हट्टामुळे पुतळ्यासाठी ठरवलेली मुळ जागा बदलण्यात आली ही वस्तूस्थिती आहे.

Exit mobile version