बँकांमध्ये मराठीचा वापर व्हावा म्हणून मनसेने सुरू केलेले आंदोलन तुर्तास स्थगित करण्यात आले आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी एक पत्रक काढून त्यांच्या महाराष्ट्र सैनिकांना हे आंदोलन थांबवण्याचे आदेश दिले. ‘आपला मराठी समाज जर कच खात असेल तर ही आंदोलने कशासाठी करायची’? असा सवाल करत त्यांनी या आंदोलनाला अर्धविराम दिलेला आहे. मराठी समाजाने खरोखरच अशी कच खाल्ली आहे काय, या प्रश्नाचा धांडोळा घेणे आम्हाला गरजेचे वाटते.