बंद दारा आड, ते चार भिंती आड; एक सडलेला प्रवास…

बंद दारा आड, ते चार भिंती आड; एक सडलेला प्रवास… | Dinesh Kanji | Uddhav Thackeray | MVA

भाजपा-शिवसेना युती तोडण्यासाठी उद्धव ठाकरे यांनी बंद दारा आड झालेल्या चर्चेचे कारण पुढे केले. ते भाजपापासून वेगळे झाल्यानंतर पुलाखालून बरेच पाणी वाहून गेलेले आहे. भाजपासोबत युतीत असताना भाजपाचे केंद्रीय नेते मातोश्रीच्या दारावर जात असत. ठाकरेंचे मन वळवण्यासाठी प्रयत्न करत असत. युतीसाठी त्यांच्या दारावर गेलेला अखेरचा दिग्गज नेता म्हणजे विद्यमान केंद्रीय गृहमंत्री अमित शहा. आज मविआचे घटक पक्ष झालेल्या ठाकरेंना त्या दिवसांची आठवण नक्कीच येत असणार. जागावाटपासाठी दारावर येणे तर खूप दूरची गोष्ट. मित्रपक्षांचे नेते ठाकरेंच्या मागण्यांना फारसे मनावरही घेताना दिसत नाहीत.

Exit mobile version