पंजाब किंग्जच्या मिडल ऑर्डर फलंदाज शशांक सिंगने सांगितले की, कर्णधार श्रेयस अय्यरने पहिल्या चेंडूपासूनच तु तुझ्या खेळावर लक्ष केंद्रीत कर, माझ्च्या शतकाबद्दल विचार करू नकोस.
अय्यरने चॅम्पियन्स ट्रॉफीपासून आयपीएलच्या नव्या सत्रापर्यंत आपला जबरदस्त फॉर्म कायम ठेवला आहे. आपल्या पहिल्या चेंडूवर मिड-ऑफला सुंदर चौकार मारत त्याचे प्रत्यय दाखवून दिले. त्याने २३०.९५ च्या जबरदस्त स्ट्राइक रेटने धावा केल्या. या खेळीत त्याने ९ षटकार आणि ५ चौकार मारले आणि नाबाद ९७ धावा केल्या.
अय्यर आपले पहिले आयपीएल शतक झळकवू शकला असता. पण शशांकने शेवटच्या षटकात सलग ५ चौकार मारले आणि स्ट्राइक रोटेट केला नाही. त्यामुळे पंजाबने २० षटकांत २४३/५ असा प्रचंड धावांचा डोंगर उभारला.
शशांकने सामन्याच्या मध्यंतरात दिलेल्या मुलाखतीत सांगितले, “होय, ही एक उत्तम खेळी केली. पण श्रेयसला पाहून आणखी प्रेरणा मिळाली. प्रामाणिकपणे सांगायचं तर श्रेयसने पहिल्या चेंडूपासूनच सांगितले की माझ्या शतकाची चिंता करू नकोस! फक्त चेंडू पाहा आणि त्यावर फटका मार. मी प्रयत्न करतो की जास्तीत जास्त सीमारेषा पार करू. मला माहीत आहे की कोणत्या फटक्यांवर मी विश्वास ठेवू शकतो. मी माझ्या ताकदीवर लक्ष केंद्रित करतो, न की त्या गोष्टींवर ज्या मी करू शकत नाही.”
हेही वाचा :
कटेरीच्या फुलांमुळे खोकला, अस्थमा आणि यकृतासह अनेक आजारांवर उपाय
चौकशीसाठी गैरहजर राहणाऱ्या कुणाल कामराला मिळणार दुसरे समन्स
पंतप्रधान मोदी आज पाहणार ‘छावा’
पंजाबमध्ये आता ड्रग सप्लायर्सवर कारवाई होणार
डेब्युटंट प्रियांश आर्यने २३ चेंडूंत ४७ धावांची झटपट खेळी खेळत धमाकेदार सुरुवात केली. त्यानंतर अय्यरनेही आपले हात मोकळे केले. मधल्या षटकांत लवकरच विकेट्स पडल्या, पण मार्कस स्टॉयनिस आणि अय्यरने ५७ धावांची भागीदारी केली। त्यानंतर शशांक आणि कर्णधाराने फक्त २८ चेंडूत ७१ धावांची भागीदारी करत पंजाब किंग्जला गुजरात टायटन्सवर ११ धावांनी रोमांचक विजय मिळवून दिला।