31 C
Mumbai
Wednesday, July 3, 2024
घरराजकारणफेक नरेटिव्ह तयार करणाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल करून पेपरफुटीचा कायदा आणणार

फेक नरेटिव्ह तयार करणाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल करून पेपरफुटीचा कायदा आणणार

पावसाळी अधिवेशनात देवेंद्र फडणवीसांनी केले स्पष्ट

Google News Follow

Related

लोकसभा निवडणूक पार पडताच फेक नरेटिव्ह विरोधकांकडून पसरवला जात असल्याचा आरोप सत्ताधाऱ्यांकडून केला जात आहे. अशातच हा मुद्दा राज्याच्या पावसाळी अधिवेशनात गाजल्याचे पाहायला मिळाले. राज्य विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन सुरू असून पुण्यातील एक वेबसाईट राज्यात फेक नरेटिव्ह पसरवत असल्याचे म्हणत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एक मोठी घोषणा केली आहे. आमदार आशिष शेलार आणि भास्कर जाधव यांच्या प्रश्नांना उत्तर देताना देवेंद्र फडणवीस यांनी ही मोठी घोषणा केली आहे.

पेपरफुटी प्रकरणावरुन चर्चा सुरू असताना ठाकरे गटाचे आमदार भास्कर जाधव यांनी राज्यातील पेपफुटीच्या प्रकरणांची यादी वाचून दाखवली. यावर देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर देताना भास्कर जाधव यांनी फेक नरेटिव्ह मांडल्याचे म्हटलं. भास्कर जाधव यांनी वाचून दाखवलेले कुठलेही घोटाळे झालेले नाहीत. पुण्यातील एका वेबसाईटने हा मेसेज सगळ्यात आधी व्हायरल केला. ज्यांनी हा फेक नरेटिव्ह तयार केला आता त्यांच्यावर गुन्हा दाखल करणार आहे, असं देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले आहे.

“खोटं नरेटिव्ह पसरवणाऱ्यांकडून राज्य सरकारला बदनाम करण्याचा प्रयत्न केला जातो. राज्यातल्या तरुणांमध्ये गैरविश्वास निर्माण करणे, एक लाख नोकऱ्या मिळाल्यानंतरही फेक नरेटिव्ह पसरवणे आणि यासाठी संघटित गुन्हेगारी काम केले जात असल्याची शंका महाराष्ट्रातल्या लोकांमध्ये आहे. त्यामुळे फेक नरेटिव्ह निर्माण करणे आणि परीक्षेत पास झालेल्या विद्यार्थ्यांच्या यशावर विरजण टाकणे असे संघटित प्रयत्न करणाऱ्या व्यक्तींवर गुन्हा दाखल करणार का? आणि राज्यात यासाठी कायदा आणणार का?” असा प्रश्न आमदार आशिष शेलार यांनी विचारला होता. त्यावर उत्तर देताना याच विधानसभा अधिवेशनात कायदा आणणार असल्याचे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं.

हे ही वाचा:

“दीदींचे पश्चिम बंगाल महिलांसाठी असुरक्षित”

धर्मवीर साहेबांच्या हिंदुत्वाची गोष्ट लवकरच येणार प्रेक्षकांच्या भेटीला

प. बंगालमध्ये विवाहबाह्य संबंधाच्या संशयावरून जोडप्याला मारहाण करणाऱ्या टीएमसी नेत्याला अटक

… म्हणून टी-२० विश्वचषक जिंकणारा भारतीय संघ अजूनही बार्बाडोसमध्येच

“अभिमन्यू पवार यांच्याबरोबर जे शिष्टमंडळ आलं होतं, त्या शिष्टमंडळाला आश्वासन दिलं होतं की कायदा आणू. मुख्यंत्र्यांनी यासाठी मागणी मान्य करुन आदेश लागू केले आहेत. याच अधिवेशनात आपण कायदा आणणार आहोत,” असे देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
163,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा