राज्यात विधानपरिषद निवडणुकीचा बिगुल!

११ जागांसाठी १२ जुलैला होणार मतदान, निवडणूक आयोगाकडून अधिसूचना जारी

राज्यात विधानपरिषद निवडणुकीचा बिगुल!

राज्यातील विधानपरिषदेच्या ११ जागांसाठीच्या निवडणूकीची घोषणा निवडणूक आयोगाकडून करण्यात आली आहे. गेल्या कित्येक दिवसांपासून विधानपरिषदेच्या ११ जागांसाठीच्या निवडणुकीकडे लक्ष होते. अखेर ही प्रतीक्षा संपली असून निवडणूक आयोगाने महाराष्ट्रच्या विधान परिषदेच्या ११ जागांसाठी निवडणुकीची घोषणा केली आहे. त्याबाबतचे वेळापत्रकही निवडणूक आयोगाने जारी केले आहे.

निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या निवडणूक कार्यक्रमानुसार विधानपरिषदेच्या ११ जागांसाठी येत्या १२ जुलै रोजी मतदान होणार आहे. तर, त्याच दिवशी निवडणुकीचा निकाल जाहीर केला जाणार आहे. या निवडणुकीसाठी २५ जून रोजी निवडणूक आयोगाकडून अधिसचूना जारी केली जाईल. त्यानंतर उमेदवारांना २ जुलैपर्यंत आपला उमेदवारी अर्ज दाखल करता येईल. ३ जुलै रोजी अर्जांची छानणी केली जाणार आहे. दरम्यान, ५ जुलैपर्यंत उमेदवारांना अर्ज मागे घेता येणार आहे. त्यानंतर १२ जुलै रोजी या निवडणुकीसाठी प्रत्यक्ष मतदान होईल आणि त्याच दिवशी मतमोजणी करून निकाल जाहीर केला जाईल.

हे ही वाचा:

गोहत्येच्या संशयामुळे दोन गटात राडा!

गायिका अलका याग्निक यांच्या श्रवणशक्तीवर व्हायरल अटॅक, आवाज येणं झालं बंद!

पंतप्रधान कार्यालयात राष्ट्रीय सल्लागार असल्याचे सांगत उकळले ५० लाख रुपये

राजस्थानमधून रामललासाठी एक अनोखी भेट, पंच धातूपासून बनविलेले धनुष्य, बाण आणि गदा पोहोचली अयोध्येत!

विधानसभेच्या आमदारांनी मतदानाच्या माध्यमातून नियुक्त केलेले विधानपरिषदेच्या ११ आमदारांचा कार्यकाळ येत्या २७ जुलै रोजी संपणार आहे. त्यामुळे नव्या आमदारांची निवड केली जाईल. २७ जुलै रोजी कार्यकाळ संपणाऱ्या आमदारांमध्ये विजय गिरकर, निलय नाईक, रमेश पाटील, रामराव पाटील, महादेव जानकर, अनिल परब, मनीषा कायंदे, डॉ. वजाहत मिर्झा, डॉ. प्रज्ञा सातव, बाबाजानी दुराणी, जयंत पाटील या ११ आमदारांचा समावेश आहे.

Exit mobile version