अभिनेते, राजकारणी, समाजसेवक…सुरेश गोपींनी केरळात कमाल केली!

सुरेश गोपी त्यांच्या परोपकारी प्रयत्नांसाठी ओळखले जातात.

अभिनेते, राजकारणी, समाजसेवक…सुरेश गोपींनी केरळात कमाल केली!

यंदाच्या लोकसभा निवडणुकीत भाजपने सुरेश गोपी यांच्या रूपात केरळमध्ये खाते उघडले. अभिनेते व राजकारणी सुरेश गोपी यांनी माकपचे व्हीएस सुनीलकुमार यांच्या विरोधात त्रिशूरची जागा जिंकली.

सुरेश गोपींचा राजकारणातील प्रवेश त्यांच्या चित्रपटातील भूमिकांइतकाच नाट्यमय होता. सन २०१६मध्ये त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आणि त्याच वर्षी त्यांना राज्यसभेची खासदारकी देण्यात आली. गोपी यांच्या लोकप्रियतेचा फायदा घेऊन डावी लोकशाही आघाडी (एलडीएफ) आणि युनायटेड डेमोक्रॅटिक फ्रंट (यूडीएफ) यांचे पारंपरिक वर्चस्व असलेल्या केरळमधील व्यापक जनाधाराला आकर्षित करण्यासाठी त्यांना उमेदवारी देऊन भाजपने धोरणात्मक चाल रचली.

विशेष म्हणजे गोपी यांचा प्रवास सोपा नव्हता. केरळचे राजकीय चित्र प्रचंड स्पर्धात्मक आहे आणि भाजपच्या विचारसरणीला अनेकदा राज्यात विरोधाचा सामना करावा लागतो. तथापि, गोपींची लोकप्रियता आणि स्वच्छ, मेहनती व्यक्ती म्हणून त्यांच्या प्रतिमेने या अडथळ्यांवर मात करण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. त्यांच्या विजयाला त्यांच्या लोकांप्रती आणि पक्षाप्रती असलेल्या समर्पणाचा तसेच, केरळमधील बदलत्या राजकीय गतिशीलतेचा पुरावा म्हणून पाहिला जातो.

सुरेश गोपी यांची लोकप्रियता आणि व्यापक ओळख यामुळे त्यांच्या प्रचाराच्या कार्यक्रमांना मोठा जनसमुदाय आकर्षित करण्यात मदत झाली. त्यांची उपस्थिती संपूर्ण मतदारसंघात जाणवली, राज्यसभा खासदार म्हणून त्यांनी केलेल्या कामांमुळे त्यांची राजकीय विश्वासार्हताही वाढली. कल्याणकारी कार्यात गोपी यांचा वैयक्तिक सहभाग होता. जसे की गरजू कुटुंबांसाठी वैद्यकीय खर्चासाठी निधी देणे आणि स्थानिक कारणांसाठी योगदान, एक दयाळू आणि संपर्क साधणारा नेता म्हणून त्यांची प्रतिमा आणखी मजबूत होत गेली.

गोपींच्या नेतृत्वाखाली भाजपची मोहीम प्रामुख्याने स्थानिक मुद्द्यांवर केंद्रित होती, विशेषत: करुवन्नूर सहकारी बँक घोटाळा, ज्याने त्रिशूर रहिवाशांमध्ये माकपबद्दल व्यापक असंतोष निर्माण केला. घोटाळ्यातील पीडितांना समर्पित असलेल्या गोपी यांच्या पदयात्रेने स्थानिक समस्या आणि भ्रष्टाचाराचे निराकरण करण्याच्या त्यांच्या समर्पणावर भर दिला, ज्याचा मतदारांना जोरदार प्रतिसाद मिळाला. पीडित कुटुंबांना भेट देणे आणि आर्थिक सहाय्य प्रदान करणे यांसह तीव्र गरजांकडे लक्ष देण्याची आणि थेट साह्य प्रदान करण्याची त्यांची क्षमता मतदारांचे समर्थन मिळविण्यासाठी महत्त्वपूर्ण ठरली.

हे ही वाचा:

नरेंद्र मोदींचा राजीनामा राष्ट्रपतींनी स्वीकारला; काळजीवाहू पंतप्रधान म्हणून जबाबदारी सांभाळणार

नितीशकुमार उलटले तरी भाजप स्थापन करू शकते एनडीए सरकार!

भाजपला आत्मचिंतन करायला लावणारे निकाल!

पंतप्रधान मोदी ९ जूनला तिसऱ्यांदा शपथ घेण्याची शक्यता

लोकसेवक

त्यांच्या राजकीय आणि सिनेमॅटिक कामगिरीच्या पलीकडे, सुरेश गोपी त्यांच्या परोपकारी प्रयत्नांसाठी ओळखले जातात. शिक्षण आणि आरोग्य सेवेसह विविध सामाजिक कार्यात त्यांचा सक्रिय सहभाग आहे. ते एक धर्मादाय ट्रस्टही चालवतात. ज्यायोगे वंचितांच्या कल्याणासाठी काम केले जाते. सामाजिक न्यायासाठी वचनबद्ध लोकसेवक म्हणून त्यांची प्रतिमा अधिक जोरकसपणे मतदारांसमोर मांडली गेली.

राष्ट्रीय नेतृत्वाचाही पाठिंबा

सुरेश गोपींना पंतप्रधान नरेंद्र मोदींसह भाजपच्या राष्ट्रीय नेतृत्वाकडून जोरदार पाठिंबा मिळाला. भाजपच्या केंद्र सरकारचे यश आणि राष्ट्रीय धोरणे गोपींच्या प्रचारात केंद्रस्थानी होती, ज्यामुळे पक्षाच्या विकास आणि सुशासनाच्या संदेशाला बळकटी मिळाली. पीएम मोदींच्या त्रिशूर भेटीने पक्षाचा पाठिंबा अधोरेखित केला, गोपींच्या प्रचाराची दृश्यमानता आणि विश्वासार्हता वाढवली.

सुरेश गोपींचा सर्वसमावेशक दृष्टिकोन लाभदायक

त्रिशूरमधील २०२४च्या निवडणुकीत गोपी, माकपचे व्हीएस सुनील कुमार आणि काँग्रेसचे के मुरलीधरन यांच्यात तिरंगी लढत होती. चर्चला सोन्याचा मुकुट अर्पण करण्यासारख्या प्रतिकात्मक परंतु महत्त्वपूर्ण मोहिमेद्वारे ख्रिश्चन समुदायासह व्यापक मतदारांना त्यांनी साद दिली. केरळमधील सत्ताधारी डाव्या आघाडीविरुद्धचा रोष, प्रतिस्पर्धी पक्षांमधील अंतर्गत कलहाचा गोपी यांना फायदा झाला. सुरेश गोपी यांनी त्रिशूरमधील प्रत्येक मतदारसंघाला भेट दिली, थेट मतदार सहभाग सुनिश्चित केला. त्यामुळे मतदारांशी मजबूत वैयक्तिक बंध निर्माण झाले. या सर्व प्रयत्नांमुळे माकपचा पारंपरिक गड भाजपकडे वळवण्यास मदत झाली.

Exit mobile version