आरएसएसचे कार्य समजण्यासाठी राहुल गांधींना घ्यावे लागतील अनेक जन्म!

आरएसएसचा विचार हा भारताच्या संस्कृतीत आणि मूल्यांमध्ये आहे.

आरएसएसचे कार्य समजण्यासाठी राहुल गांधींना घ्यावे लागतील अनेक जन्म!

काँग्रेसचे नेते राहुल गांधी हे सध्या अमेरिकेत असून तिथे ते नेहमीप्रमाणे भारतासंदर्भात आपली मते व्यक्त करत आहेत. त्यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघावरही या भाषणात टीका केली आहे. त्यावरून भाजपाचे केंद्रीय मंत्री गिरीराज सिंह यांनी राहुल गांधी यांच्यावर शरसंधान केले आहे.

गिरीराज सिंह यांनी म्हटले आहे की, जे विश्वासघातकी आहेत त्यांना आरएसएस काय कळणार? टेक्सास विद्यापीठातील राहुल गांधी यांच्या भाषणात त्यांनी म्हटले होते की, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला वाटते की, भारत ही एकच संकल्पना आहे पण आम्हाला वाटते की, भारत हा अनेक संकल्पनांवर आधारित आहे.

राहुल गांधी यांनी त्यात म्हटले की, लोकसभा निवडणुकीत भाजपा आणि आरएसएसविरुद्ध संघर्ष झाला. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे भारताच्या राज्यघटनेवर हल्ला करत असल्याची लोकांची भावना होती. त्यावर गिरीराज सिंह म्हणाले की, जर राहुल गांधी यांच्या आजीशी संवाद साधण्याचे एखादे तंत्र असेल तर त्यांना विचारता येईल, आरएसएसची भूमिका. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कार्य समजण्यासाठी राहुल गांधींना अनेक जन्म घ्यावे लागतील. विश्वासघातकी माणूस आरएसएसला समजून घेऊ शकत नाही. परदेशात जाऊन भारताची बदनामी करणाऱ्यांना तर ही समज असणेच शक्य नाही.

हे ही वाचा:

‘मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना अटक करा’

जम्मू-काश्मीरच्या नौशेरामध्ये दोन दहशतवाद्यांचा खात्मा

सूरतमध्ये अल्पवयीन मुलांकडून गणेश मंडपावर दगडफेक; २७ जणांना अटक

हा कोल्हापूरच्या शाहू महाराज छत्रपतींचा अपमान नाही तर काय आहे?

गिरीराज सिंह म्हणाले की, राहुल गांधी हे परदेशात केवळ भारताची बदनामी करण्यासाठीच जातात. आरएसएसला समजून घेणे हे राहुल गांधी याना या जन्मात शक्य नाही. कारण आरएसएसचा विचार हा भारताच्या संस्कृतीत आणि मूल्यांमध्ये आहे.

भाजपाचे नेते आणि प्रवक्ते अमित मालवीय यांनी राहुल गांधी यांच्याविषयी सॅम पित्रोडा यांनी केलेल्या विधानावर टिप्पणी केली. पित्रोडा यांनी तिथे म्हटले होते की, राहुल गांधी यांचे शिक्षण, त्यांचा प्रचंड अभ्यास, त्यांची विचार करण्याची पद्धत यामुळे त्यांना समजून घेणे कठीण आहे. त्यावर मालवीय म्हणाले की, राहुल गांधी यांना समजून घेणे खूपच कठीण आहे, हे पित्रोडांचे विधान खरेच आहे. त्यांच्या चुका या कधी कधी महाकाय असतात. पित्रोडा यांनी असेही म्हटले होते की, राहुल गांधींकडे जी दृष्टी आहे ती भाजपाकडे नाही. त्यामुळे ते पप्पू नाहीत मात्र त्यांना तसे दाखवले जाते.

 

Exit mobile version