१५९ तास कार्यरत राहिल्यानंतर अर्थसंकल्पीय अधिवेशन समाप्त; वक्फसह १६ विधेयके मंजूर

दोन्ही सभागृहे तहकूब; पावसाळी अधिवेशनादरम्यान पुन्हा सुरू होणार कामकाज

१५९ तास कार्यरत राहिल्यानंतर अर्थसंकल्पीय अधिवेशन समाप्त; वक्फसह १६ विधेयके मंजूर

संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन वादळी ठरले. ३१ जानेवारी २०२५ रोजी सुरू झालेले अधिवेशन शुक्रवार, ४ एप्रिल रोजी तहकूब करण्यात आले. दोन्ही सभागृहे आता संसदेच्या पावसाळी अधिवेशनादरम्यान पुन्हा सुरू होतील. राज्यसभेचे अध्यक्ष आणि उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी राज्यसभेच्या २६७ व्या सत्रात आपल्या समारोप भाषणात सभागृहातील सदस्यांचे त्यांच्या सक्रिय सहभागाबद्दल आणि मौल्यवान योगदानाबद्दल आभार मानले.

जगदीप धनखड म्हणाले की, “राज्यसभेच्या २६७ व्या सत्राच्या अतिशय उत्पादक अशा शेवटाकडे पोहोचलो असून अधिवेशनाची बैठक संपत असताना, प्रत्येकाच्या सक्रिय सहभागाबद्दल आणि मौल्यवान योगदानाबद्दल आभार मानतो.” त्यांनी पुढे सांगितले की, अधिवेशनादरम्यान सभागृह १५९ तास कार्यरत राहिले, सभागृहाची उत्पादकता ११९ टक्के होती. सभागृहाची गुरुवार, ३ एप्रिल रोजी सकाळी ११ वाजता सुरू होऊन ४ एप्रिल रोजी पहाटे ४:०२ वाजेपर्यंत चालणारी बैठक ही सर्वात जास्त काळ चालणारी बैठक ठरली. त्यांनी पुढे सांगितले की, वरिष्ठ सभागृहात ४९ खाजगी सदस्यांची विधेयके सादर करण्यात आली.

हे ही वाचा : 

उत्तर प्रदेश: ५० वर्षांपूर्वी इस्लाम स्वीकारणाऱ्या १० मुस्लिमांची घरवापसी!

मुस्लिम जमातचे रझवी वक्फ विधेयकाच्या पाठीशी

काँग्रेस वक्फ सुधारणा विधेयकाला देणार सर्वोच्च न्यायालयात आव्हान

वक्फचे समर्थन करणाऱ्या मुस्लिम व्यक्तीला तुडवले, संभलमधील घटना

दरम्यान, लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला म्हणाले की, संसदेच्या कनिष्ठ सभागृहाच्या ३१ जानेवारी रोजी अधिवेशन सुरू झाल्यापासून २६ बैठका झाल्या. ते म्हणाले की, “आपण १८ व्या लोकसभेच्या चौथ्या सत्राच्या शेवटी आहोत. हे अधिवेशन ३१ जानेवारी २०२५ रोजी सुरू झाले. या अधिवेशनात २६ बैठका झाल्या. अधिवेशनादरम्यान, १६ विधेयके सादर करण्यात आली, ज्यात वक्फ दुरुस्ती विधेयक आणि मुस्लिम वक्फ (रद्द) विधेयक मंजूर झाले. या अधिवेशनातील एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे वक्फ दुरुस्ती विधेयक शुक्रवारी पहाटे संसदेने मॅरेथॉन चर्चेनंतर मंजूर केले गेले. संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन दोन भागात बोलावण्यात आले होते. पहिला टप्पा ३१ जानेवारी रोजी सुरू होऊन १३ फेब्रुवारीपर्यंत चालले. संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा दुसरा टप्पा १० मार्च रोजी सुरू झाला.

ही तर कमाल झाली! नरेंद्र मोदी बँकॉकमध्ये राहुल गांधी भारतात | Mahesh Vichare | Rahul Gandhi |

Exit mobile version