भाजपा-अण्णाद्रमुक आगामी विधानसभा निवडणुकीत एकत्र!

केंद्रीय गृहमंत्री अमित शहांची युतीची घोषणा 

भाजपा-अण्णाद्रमुक आगामी विधानसभा निवडणुकीत एकत्र!

‘भारतीय जनता पक्ष’ आणि ‘अण्णाद्रमुक’ आगामी तामिळनाडू विधानसभा निवडणुका एकत्र लढणार आहेत. दोन्ही पक्षांमध्ये युती झाली आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी शुक्रवारी (११ एप्रिल) चेन्नई येथे संयुक्त पत्रकार परिषद घेत युतीची घोषणा केली. यावेळी त्यांच्यासोबत मंचावर एआयएडीएमकेचे सरचिटणीस एडाप्पाडी के पलानीस्वामी (ईपीएस) आणि माजी राज्य भाजप अध्यक्ष के अन्नामलाई होते. दरम्यान, या दोन्ही पक्षांमध्ये यापूर्वीही युती झाली होती.

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह म्हणाले, “आज अण्णा द्रमुक आणि भाजपने निर्णय घेतला आहे की आगामी निवडणुका अण्णा द्रमुक, भाजप आणि एनडीए अंतर्गत इतर पक्ष एकत्रितपणे लढवतील. ही निवडणूक राष्ट्रीय पातळीवर पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाखाली आणि राज्यात पलानीस्वामींच्या नेतृत्वाखाली लढवली जाईल. मला विश्वास आहे की येत्या निवडणुकीत एनडीए सरकार स्थापन होईल. आम्ही अण्णा द्रमुकच्या अंतर्गत बाबींमध्ये हस्तक्षेप करणार नाही. अण्णा द्रमुकचे नेतृत्व आणि भाजपचे प्रादेशिक नेतृत्व उर्वरित पक्षांबद्दल निर्णय घेईल. सरकार स्थापनेनंतर जागांची संख्या आणि मंत्र्यांचे वाटप हे दोन्ही पक्ष चर्चेनंतर ठरवतील. सध्या कोणतीही चर्चा होत नाही.”

ते पुढे म्हणाले, मुख्य मुद्द्यांवरून लक्ष हटवण्यासाठी द्रमुक तामिळनाडूमध्ये सनातन धर्म, भाषा धोरण असे मुद्दे उपस्थित करत आहे. गृहमंत्र्यांनी द्रमुक सरकारवर टीका करताना म्हटले, तमिळनाडूचे लोक भ्रष्टाचार, कायदा, सुव्यवस्था, दलित आणि महिलांवरील अत्याचारांविरुद्ध मतदान करतील. द्रमुक सरकार दारू, वाळू उत्खनन, नोकरीसाठी पैसे, मनरेगा आणि इतर घोटाळ्यांमध्ये सहभागी आहे. आता एमके स्टॅलिन आणि उदयनिधी स्टॅलिन यांनी सर्वांना उत्तर द्यावे.

दरम्यान, २०२१ च्या विधानसभा निवडणुका भाजप आणि अण्णाद्रमुक यांनी एकत्र लढवल्या होत्या. त्यावेळी भाजपचे ४ आमदार निवडणुकीत विजयी झाले होते. तथापि, २०२४ च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी भाजप आणि अण्णाद्रमुक यांच्यातील युती तुटली. या निवडणुकीत भाजप आणि अण्णाद्रमुक दोघांनाही लोकसभेची एकही जागा जिंकता आली नाही. त्याच वेळी, द्रमुक आणि काँग्रेसच्या युतीला निवडणुकीत मोठा विजय मिळाला.

हे ही वाचा : 

चिदंबरम यांनीच नष्ट केला होता, २६/११ प्रकरणातील एक महत्वाचा दुवा

काँग्रेस नेता म्हणतो, वक्फ विधेयकाच्या विरोधात गावागावात ८-१० लोक मरावेत!

“ती म्हणाली – ‘उफ्फ!’ आणि जगाने पाहिलं, प्रेमाला रंग असतो!”

चीनचा पलटवार; अमेरिकन वस्तूंवरील करात १२५ टक्क्यांपर्यंतची वाढ

तथापि, जर आपण मतांच्या टक्केवारीबद्दल बोललो तर लोकसभा निवडणुकीत तामिळनाडूमध्ये भाजपची मतांची टक्केवारी सुमारे ११.२४ टक्के होती आणि एआयएडीएमकेची मतांची टक्केवारी सुमारे २०.४६ टक्के होती. त्याच वेळी, एकट्या द्रमुकला २६.९३ टक्के मते मिळाली होती. अशा परिस्थितीत विधानसभा निवडणुकीसाठी अण्णाद्रमुकसोबत युती केल्याने भाजपला फायदा होऊ शकतो आणि भाजपला तामिळनाडूच्या विविध भागात प्रवेश करण्याची आणि स्वतःला बळकट करण्याची संधी मिळेल. जर अण्णाद्रमुकशी युती करून राज्यात सरकार स्थापन झाले तर भाजपच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकार आणि तामिळनाडू सरकारमधील संघर्ष कमी होईल.

चिदंबरम यांनीच नष्ट केला होता २६/११ प्रकरणातील एक महत्वाचा दुवा | Dinesh Kanji | P. Chidambaram |

Exit mobile version