अजित पवारांचे आवाहन; वाढदिवस नको, इर्शाळवाडीच्या ग्रामस्थांना मदत करा!

अजित पवारांचा निर्णय

अजित पवारांचे आवाहन; वाढदिवस नको, इर्शाळवाडीच्या ग्रामस्थांना मदत करा!

रायगड जिल्हातील खालापुर तालुक्यातील इर्शाळवाडी या गावावर बुधवार, १९ जुलै रोजी दरड कोसळली. इर्शाळगडाच्या पायथ्याशी वसलेल्या इर्शाळवाडी गावावर दरड कोसळली. यामध्ये अनेक लोकांना आपला जीव गमवावा लागला तर शेकडो लोक अजूनही ढिगाऱ्याखाली आहेत. जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दरम्यान, राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी एक आवाहन केलं आहे.

अजित पवार यांचा २२ जुलै रोजी वाढदिवस असतो. दरवर्षी कार्यकर्ते त्यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा करतात. मात्र, यंदा हा खर्च न करता इर्शाळवाडीच्या पुनर्उभारणी खर्च करण्यात यावा असे आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले आहे. इर्शाळवाडी येथे घरांवर दरड कोसळून झालेल्या दुर्घटनेबद्दल उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी तीव्र दु:ख व्यक्त केले आहे. यावर्षी वाढदिवस साजरा न करण्याचा निर्णय त्यांनी घेत इर्शाळवाडी दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर कुणीही आपला वाढदिवस साजरा करु नये, असे आवाहन त्यांनी केले आहे.

पुष्पगुच्छ, होर्डींग, जाहिरातींवर खर्च न करता तो निधी इर्शाळवाडी गावाच्या पुनर्उभारणी आणि ग्रामस्थांच्या मदतीसाठी उपयोगात आणावा, असं आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले आहे.

हे ही वाचा:

पीओपीच्या गणेशमूर्तीकारांच्या पोटावर पाय देऊ नका

संजय राऊत यांचे निकटवर्तीय सुजित पाटकर अटकेत

मणिपूरच्या घटनेमुळे मोदी संतापले

इर्शाळवाडी दुर्घटना: मदतकार्यावर मुख्यमंत्र्यांचे ऑन फिल्ड उपस्थित राहून लक्ष

इर्शाळवाडीवर कोसळलेल्या दरडीमुळे आतापर्यंत १० लोकांना आपला जीव गमवावा लागला. बचाव पथकाला ९८ लोकांना वाचवण्यात यश आलं आहे, तर शेकडो लोक अजूनही मातीच्या ढिगाऱ्यात अडकल्याची शक्यता आहे. बाहेर काढण्यात आलेल्या ९८ लोकांपैकी ७० लोकं सुखरुप असल्याची माहिती आहे. सध्या इर्शाळवाडीमधील ढिगारा उपसण्याचे काम सुरु आहे,पण पावसामुळे मदत कार्यात अडथळा निर्माण होतोय.

Exit mobile version