28 C
Mumbai
Tuesday, September 17, 2024
घरधर्म संस्कृतीसमाजाचे विघटन करून आपापसातील संघर्ष वाढविण्याचे प्रयत्न होत आहेत!

समाजाचे विघटन करून आपापसातील संघर्ष वाढविण्याचे प्रयत्न होत आहेत!

सरसंघचालक मोहन भागवत यांनी उपस्थित केला सवाल, संघाचा विजयादशमी उत्सव आणि शस्त्रपूजन

Google News Follow

Related

आपल्या देशातील आंतरिक असंतुष्टांना हाताशी धरून काही परदेशी शक्ती इथले वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न करीत आहेत. भारतात हिंसा आणि असंतोष पसरावा याकरिता “टूल किट” सक्रिय केले जातात. तेव्हा असे फसवे मायाजाल आणि भ्रामक गोष्टींपासून सावध राहण्याची गरज असल्याचे प्रतिपादन सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी केले. नागपुरातील रेशिमबाग मैदानावर आयोजित राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विजया दशमी कार्यक्रमात ते बोलत होते. याप्रसंगी सुप्रसिद्ध गायक शंकर महादेवन, विदर्भ प्रांत संघचालक राम हरकरे आणि महानगर संघचालक राजेश लोया व्यासपीठावर उपस्थित होते.

 

यावेळी सरंसंघचालक म्हणाले की, आपल्या समाजाचे विघटन होऊन विलगता आणि आपापसातील संघर्ष वाढत जावेत यासाठीही जोरदार प्रयत्न केले जात आहेत. हे लोक स्वतःला सांस्कृतिक मार्क्सवादी म्हणवत असले तरी १९२० च्या दशकातच ते मार्क्सला विसरले असून केवळ सत्ता प्राप्ती इतकेच त्यांचे उद्दिष्ट आहे. ते जगातील सर्व सुव्यवस्था, मांगल्य, संस्कार आणि संयम यांना विरोध करतात. देशात आपल्या राजकीय स्वार्थासाठी प्रतिस्पर्ध्याला पराभूत करण्याच्या हेतूने अशा अनिष्ट शक्तींशी युती करण्याचा अविवेक केला जात आहे. समाजाच्या एकतेसाठी राजकारणापासून दूर जात विचार करण्याची गरज असल्याचे सरसंघचालक म्हणाले.

मणिपूरमधील हिंसेबाबत चिंता व्यक्त करताना डॉ. भागवत म्हणाले की, गेल्या १० वर्षांपासून शांत असलेल्या मणिपूरमध्ये अचानक कलह का आणि कसा निर्माण झाला ? हिंसाचार करणाऱ्यांमध्ये सीमेपलीकडील अतिरेकीही होते का ? आपल्या अस्तित्वाच्या भवितव्याबाबत धास्तावलेल्या मैतेई आणि कुकी समाजाच्या संघर्षाला जातीय वा धार्मिक स्वरूप देण्याचा हा प्रयत्न का आणि कोणाकडून करण्यात आला ? यात बाह्य शक्तींचा हात होता का ? असा सवाल सरसंघचालकांनी उपस्थित केला. तसेच ही समस्या सोडवण्यासाठी बहुआयामी प्रयत्न करावे लागतील. त्यासाठी राजकीय इच्छाशक्ती, अनुरूप सक्रियता आणि कार्यक्षमता ही काळाची गरज असतानाच, समाजातील प्रबोधनशील नेतृत्वालाही परस्परांमधील अविश्वासाची दरी भरून काढण्यासाठी विशेष भूमिका बजावावी लागेल असे सरसंघचालकांनी सांगितले.

 

हे ही वाचा:

रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतिन यांना हार्ट अटॅक?

नाशिकच्या गिरणा नदीत सापडलं कोट्यवधींचं ड्रग्ज

चॅटजीपीटीने लिहिलं काही क्षणात गाणं; बँडने केला लाईव्ह परफॉर्मन्स

भारताचे माजी फिरकीपटू बिशनसिंह बेदी यांचे निधन!

 

देशात एकता टिकविण्यासाठी विशेष प्रयत्न करावे लागणार आहेत. डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधानात एकतेचेच तत्व दिले आहे. त्यांच्या आदर्शांवर देशाला चालावे लागेल. संविधान प्रदान करताना आदरणीय डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान सभेत दिलेल्या दोन भाषणांकडे लक्ष दिले तर यातील मर्म आपल्या लक्षात येईल. सर्वांनी त्या भाषणांचा अभ्यास करण्याचे आवाहन सरसंघचालकांनी केले.

 

शासन, क्रीडापटू आणि वैज्ञानिकांचे कौतुक

यावेळी सरसंघचालकांनी भारत सरकार, देशाचे वैज्ञानिक आणि क्रीडापटू यांचे कौतुक केले. त्यांनी आशियाई क्रीडा स्पर्धेतील भारताच्या ऐतिहासिक कामगिरीचा उल्लेख केला. भारताच्या खेळाडूंनी अतिशय चांगली कामगिरी केल्याचे डॉ. भागवत यांनी नमूद केले. तसेच चांद्रयान मोहिमेच्या निमित्ताने भारताची शक्ती, बुद्धी आणि कौशल्याची झलकदेखील जगाने पाहिली. शास्त्रज्ञांच्या तंत्रज्ञान आणि तंत्रकुशलतेला नेतृत्वाच्या इच्छाशक्तीची जोड मिळाली. आपला देश सर्वच बाबतीत अग्रेसर होतो आहे. आर्थिक स्थितीतदेखील प्रगती दिसून येत आहे. स्टार्टअपची क्रांतीदेखील आपण पाहिल्याचे सरसंघचालकांनी नमूद केले.

मंदिरासोबत मनातही रामाची प्राणप्रतिष्ठा व्हावी

अयोध्येतील राममंदिराच्या गर्भगृहात आगामी २२ जानेवारी रोजी श्री रामललाची प्राणप्रतिष्ठा होणार आहे. व्यवस्थेच्या मर्यादा आणि सुरक्षेची सावधानता लक्षात घेऊन अयोध्येत त्या शुभ प्रसंगी केवळ मर्यादित संख्येतंच उपस्थित राहता येणार आहे. अयोध्येतील राममंदिरात श्री रामलल्लाच्या प्रवेशाने, प्रत्येकाच्या हृदयात आपल्या मनातील राम जागा व्हावा, मनाची अयोध्या सजवावी, असे आवाहन सरसंघचालकांनी केले.

मतदान प्रत्येकाचे राष्ट्रीय कर्तव्य

यावेळी सरसंघचालकांनी मतदानावरदेखील भाष्य केले. आगामी २०२४ मध्ये लोकसभेची निवडणूक होईल. निवडणुकीच्या रणधुमाळीत भावना भडकावून मते मिळवण्याचे प्रयत्न अपेक्षित नसले तरी ते होतच राहतात. समाजात फूट पाडणाऱ्या या गोष्टींपासून समाजाने स्वतःला दूर ठेवावे. मतदान करणे हे प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य आहे. त्याचे प्रत्येकाने पालन करायला हवे. देशाची एकात्मता, अखंडता, अस्मिता आणि विकासाचे मुद्दे लक्षात घेऊन प्रत्येकाने मतदान करावे. जे पर्याय उपलब्ध आहेत, त्यातील सर्वात चांगल्या पर्यायाला मतदान करावे, असे आवाहन त्यांनी केले.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
177,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा