28 C
Mumbai
Friday, April 11, 2025
घरधर्म संस्कृतीउत्तर प्रदेशातील ९०,००० कैद्यांनी केले पवित्र स्नान!

उत्तर प्रदेशातील ९०,००० कैद्यांनी केले पवित्र स्नान!

त्रिवेणी संगमाचे पवित्र पाणी लखनऊ, अयोध्या आणि अलीगडमधील विविध शहरांच्या तुरुंगांमध्ये आणले होते

Google News Follow

Related

प्रयागराजमधील महाकुंभमध्ये सहभागी होण्यासाठी देशासह जगभरातून भाविक दाखल होत आहेत. भाविकांच्या संख्येने पूर्वीचे विक्रम मोडीत काढले आहेत. दरम्यान, उत्तर प्रदेशातील ७५ तुरुंगांमध्ये कैद असलेल्या सुमारे ९०,००० कैद्यांना महाकुंभाच्या पवित्र स्नानाची संधी देण्यात आली. अधिकाऱ्यांनी त्रिवेणी संगमाचे पवित्र पाणी लखनऊ, अयोध्या आणि अलीगडमधील विविध शहरांच्या तुरुंगांमध्ये आणले होते. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, त्रिवेणी संगम येथून आणलेले पवित्र पाणी नियमित पाण्यात मिसळले गेले. पुढे हे पाणी लहान टाक्यांमध्ये साठवले गेले आणि यामुळे कैद्यांना तुरुंगातच पवित्र स्नान आणि प्रार्थना करता आली.

उत्तर प्रदेशचे तुरुंगमंत्री दारा सिंग चौहान यांनी लखनऊ येथे झालेल्या कार्यक्रमात सांगितले की, सुमारे ९०,००० कैद्यांना पवित्र स्नान करण्याची संधी देण्यात आली. उत्तर प्रदेश हे पहिले राज्य आहे जिथे तुरुंग विभागाने कैद्यांना पवित्र पाण्यात स्नान करण्याची संधी दिली आहे. बाहेरील लोक महाकुंभसाठी जाऊ शकतात, परंतु जे लोक त्यांच्या श्रद्धा असूनही तुरुंगात आहेत, त्यांना अशी सक्ती आहे की ते चार भिंतींमधून बाहेर पडू शकत नाहीत. आमच्या तुरुंगातील सर्व वरिष्ठ आणि कनिष्ठ अधिकाऱ्यांच्या पाठिंब्याने, उत्तर प्रदेशातील सुमारे ९०,००० कैद्यांनी पवित्र स्नान केले, असे मंत्री म्हणाले. त्यांनी पुढे म्हटले की, कैद्यांनी स्वतः पवित्र स्नानाची इच्छा व्यक्त केली होती. सनातनच्या संगमात डुबकी मारायची असून सनातन धर्माचे पूर्ण भागीदार बनायचे आहे, असं कैदी म्हणाले होते.

हे ही वाचा..

सकल हिंदू समाजाच्या आंदोलनाच्या इशाऱ्यानंतर अनधिकृत थडग्यावर पालिकेची कारवाई

राजस्थानचे मुख्यमंत्री भजनलाल शर्मा यांना जीवे मारण्याची धमकी

महाकुंभात महिलांचे स्नान करतानाचे व्हिडीओ युट्युबवर अपलोड प्रकरणी; तिघांना अटक

संभल हिंसाचार : १२ पैकी ६ प्रकरणात आरोपपत्र दाखल

अलीगढचे तुरुंग अधीक्षक ब्रिजेंद्र सिंह यादव यांनी सांगितले की, “राज्य सरकार आणि प्रशासनाच्या सूचनांनुसार, तुरुंगातील कैद्यांना महाकुंभमेळ्याला जाता येत नसल्याने त्यांच्यासाठी ‘स्नान पर्व’ आयोजित करण्यात आले होते. त्यामुळे महाकुंभातील पाणी तुरुंगात आणण्याचा निर्णय घेण्यात आला जेणेकरून ते पवित्र स्नान करू शकतील. यात सर्व धर्मीय कैदी उत्साहाने सहभागी होत आहेत.” अयोध्येत, तुरुंगातील सुमारे ७५७ कैद्यांनी आयोजित ‘स्नान पर्वा’त भाग घेतला.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

113,000चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
241,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा