‘पाकव्याप्त काश्मीरची तुलना जम्मू काश्मीरच्या प्रगतीशी कुणीतरी नक्कीच करत असेल’

परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांचा विश्वास

‘पाकव्याप्त काश्मीरची तुलना जम्मू काश्मीरच्या प्रगतीशी कुणीतरी नक्कीच करत असेल’

‘पाकव्याप्त काश्मीरमध्ये राहणारी कोणीतरी व्यक्ती नक्कीच त्यांच्या परिस्थितीची जम्मू आणि काश्मीरमध्ये राहणाऱ्या व्यक्तीशी, तिथल्या प्रगतीची त्यांच्या परिस्थितीशी तुलना करत असतील,’ असा विश्वास परराष्ट्र एस. जयशंकर यांनी मंगळवारी कोलकात्यातील एका कार्यक्रमात व्यक्त केला.

कोलकाता येथे एका कार्यक्रमात बोलताना जयशंकर म्हणाले, ‘आज पाकव्याप्त काश्मीरमध्ये काही घटना घडत आहेत. त्याचे विश्लेषण करणे खूप जटील आहे, परंतु पाकव्याप्त काश्मीरमध्ये राहणारा कोणीतरी त्यांच्या परिस्थितीची तुलना जिवंत असलेल्या एखाद्या व्यक्तीशी करत असेल, याबद्दल माझ्या मनात शंका नाही. आजकाल जम्मू आणि काश्मीरमधील नागरिक कसे प्रगती करत आहेत, हे पाहून त्यांना हे समजले आहे की त्यांच्याशी भेदभाव केला जात आहे किंवा त्यांना वाईट वागणूक दिली जात आहे.’

पाकव्याप्त काश्मीर नेहमीच भारतासोबत आहे आणि ते नेहमीच भारताचाच अविभाज्य भाग राहील, याचा पुनरुच्चार करतानाच कलम ३७० लागू होईपर्यंत, पाकव्याप्त काश्मीरबद्दल फारशी चर्चा झाली नाही, असेही जयशंकर यांनी यावेळी सांगितले.

अन्न, इंधन आणि अन्य गरजेच्या वस्तूंच्या किमती पाकिस्तानात गगनाला भिडल्या आहेत. त्यावरून निदर्शने सुरू झाल्यानंतर पाकव्याप्त काश्मीरही तापू लागले आहे. सोशल मीडियावरील अनेक व्हिडीओंमध्ये अनेक स्थानिक हे पोलिस आणि सैन्यासोबत संघर्ष करताना दिसत आहेत. काही व्हिडिओंमध्ये पाकिस्तानच्या विरोधात निदर्शकांच्या गटाकडून स्वातंत्र्याच्या घोषणा दिल्या जात असल्याचेही दिसत आहे.

हे ही वाचा:

पंतप्रधान नरेंद्र मोदी त्यांचे पैसे कुठे गुंतवतात?

‘स्वाती मालीवाल हिच्या जीवाला धोका’

दिल्ली: प्रवाशांच्या मौल्यवान वस्तू चोरण्यासाठी चोरट्याचा २०० वेळा विमान प्रवास!

लोहमार्ग पोलीस आयुक्त कैसर खालिदनी २०२१मध्ये दिली होती होर्डिंगला परवानगी

१२ मे रोजी पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ यांनी आंदोलकांना शांत करण्यासाठी पाकव्याप्त काश्मीरला वीज आणि गव्हाच्या अनुदानासाठी २३ अब्ज रुपये देण्यास मंजुरी दिली. मात्र, परिसरात आंदोलने सुरूच आहेत. ८ मे रोजी जयशंकर यांनी पाकव्याप्त काश्मीर हा भारताचा एक भाग असल्याचे सांगत प्रत्येक भारतीय राजकीय पक्ष पाकव्याप्त काश्मीर भारतात परत आणण्याची सुनिश्चिती करण्यासाठी वचनबद्ध आहे, असे म्हटले होते.

Exit mobile version